Wednesday, February 25, 2026

घाटाचा पहारेकरी किल्ले राजमाची

 Submitted by ferfatka on 25 February, 2026 - 00:00

IMG_20260219_120520 copy.jpgआज शिवजयंती. १९ फेब्रुवारी २०२६. वर्दळीपासून थोडा दूर व मोजकेच दुर्ग प्रेमी व पर्यटक जात असलेल्या लोणावळ्याजवळील राजमाची दुर्ग पाहण्यास निघालो. मुंबईला जाताना जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर खंडाळ्याचा घाट सुरु होताना राजमाची पॉर्इंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच हा राजमाची किल्ला. लोणावळ्यापासून खंडाळाच्या दिशेने जाताना (उजव्या हाताल) कुणे नामा या गावाचा फाटा लागतो. हाच रस्ता पुढे राजमाचीला जाण्याचा मार्ग आहे. ही वाट सुमारे १५ कि.मी ची आहे. या वाटेने स्वत:चे वाहन घेऊन गेल्यास १ ते १.३० तास लागतो. आम्ही लोणावळ्यात ११.३० ला पोहाचलो व उधेवाडीला १.२० ला पायथ्याशी पोहचलो. तेथून वेळेअभावी फक्त श्रीवर्धन पाहून दुपारी ४ ला परतीच्या प्रवासाला लागलो.

IMG_20260219_124600.jpg

विविध झाडे, घनदाट जंगलामुळे हे क्षेत्र अनेक पक्ष्यांच्या प्रजातींचे आश्रयस्थान आहे आणि दुर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. पावसाळयात सर्वत्र प्रचंड धुके असते. लोणावळ्यापासून जवळ परंतु निसर्गाने थोडे लांब ठेवलेले उधेवाडी ही ७० ते ७५ घरांची छोटीशी वाडी. चारही बाजुने घनदाट जंगल, पावसाळ्यात धो-धो पडणारे रौद्ररुप धारण केलेले धबधबे, सर्वत्र हिरवेगार असलेल्या या ठिकाणी आहे राजमाची. महाराष्ट्रात राजमाची हा एकच दोन बालेकिल्ले असणारा किल्ला. या किल्ल्याच्या माचीवर हे दोन बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय. या किल्ल्याचा पसारा प्रचंड असून पुरातन अवशेष देखील मोठया प्रमाणात आहेत. लोणावळ्याकडून उधेवाडीला येताना वाटेत पुरातन तटबंदीचे काही अवशेष दिसून येतात. सुमारे १० फुट व १५ फुट उंची असलेली ही तुटकी तटबंदी पाहून पूर्वी ही तटबंदी कशी असेल याचा अंदाज येतो. लोणावळ्याहून कुणे नामा रस्त्याने येताना गड येण्यापूर्वी अलीकडेच काही अंतरावर तटबंदी दिसते. पूर्वी ही गडाची ही वेस होती. आता काळाच्या ओघात पडली आहे. येथून कच्चा रस्ता तयार केला आहे. या वेशीच्या आत शिरताच डाव्या हाताला गणेश, मारुतीचे मंदिर आहे. पुढे काही अंतरावर सतीच्या शिळाही आहेत. ही वेस ओलांडली की राजमाचीची हद्द सुरू होते.

आम्ही उधेवाडीत पोहचलो. गाडी लावून श्रीवर्धनकडे जाण्यास निघालो. येथील शांत परिसर पाहून मन प्रसन्न झाले. उधेवाडीला पोहोचल्यावर, राजमाची ट्रेक खूपच छोटा आहे. २० ते २५ मिनिटांत आपण गडावर पोहचतो. किल्ला व्यवस्थित राखला आहे आणि उधेवाडीहून येणारा ट्रेक मार्ग दगडी पायºयांनी तयार केला आहे.
भैरोबा मंदिरापर्यंत दगडी पायºयांनी येथील रस्ता चांगला तयार केला. वाटेत मोठ्या कातळात ३ पाण्याची टाकी खोदलेली दिसतात. परंतु ही वैशिष्ट्यपूर्ण टाकी आहेत. कारण कातळात संपूर्णपणे तीन खोल्यांमध्ये हे तयार केले आहे. येथे बाराही महिने पाणी असते. तीन गुहेत पाणी आहे. येथील स्थानिक लोक त्याचा वापर पिण्यासाठी करतात. मी देखील बाटलीभरून पाणी घेतले एकदम थंडगार असे हे पाणी आहे. पिण्यास देखील चांगले लागले. एकदम स्वच्छ.

भर उन्हात दुपारी २ वाजता गडावर जाण्यास सुरूवात केली. १५ मिनिटांतच दरवाजात येऊन पोहोचलो. कधीकाळी अस्तित्वात असलेल्या भक्कम, बेलाग अशा दरवाज्यातून पण सध्या भग्न अवस्थेतल्या पाहरेकरांच्या देवडीतून किल्ल्यात प्रवेश केला. उजवीकडे जात असतानाच आमची पावले थबकली. काळजात एकदम धस्सच झालं......

तेव्हा जरा जपूनच....
मुख्य दरवाज्याच्या आतमध्ये प्रवेश केला. येथे पाहरेकºयांच्या देवड्या आहेत. जुनी जोती अजूनही येथे दिसतात. तटबंदीचा काही भाग येथून जातो. याच ठिकाणी तटबंदीवर एक घोणस जातीच्या सापाचे छोटे पिलू दिसून आले. त्याचे फोटो काढले. पुढे निघलो. दहाच फुट अंतर गेलो असू, अचानक तटबंदीच्या भिंतीवर गवतासारखे काही तरी काहीतरी हालल्याचा भास झाला आणि पुढच्याच क्षणी एकदम धक्काच बसला. कारण भिंतीवर घोणस जातीचा साप निवांत बसला होता. आमची चाहुल लागताच दोन दगडांच्या चिºयांमध्ये तो घुसला व एका चिºयातून बाहेर येऊन पुन्हा बाहेर डोकावू लागला.
घोणस हा अत्यंत विषारी म्हणून ओळखला जातो.‘रसेल्स व्हायपर’ या नावाने ओळखला जातो. थोडीफार सापांची ओळख असल्याने एकदम घाबरून न जाता. आम्ही शांतपणे पुढे गेलो. आमच्या मागून सासवड येथील दोघे जण येत होते. त्यांनाही सावध केले. एकाच किल्यावर दोन घोणस सापांचे दर्शन झाल्याने एकदम मस्त वाटले. मनात पुढे जाऊन किल्ला पाहावा की नको असे वाटत होेते. पण धीर करून किल्ला पाहण्यासाठी निघालो. शेवटी हे तर त्यांचे घर आहे. आपण येथे पाहुणे म्हणून आलो आहोत. तेव्हा जपूनच पुढे पाऊल टाकले.

IMG_20260219_132217.jpgरस्ता न झालेलाच चांगला :
मुळात सोपा असलेला हा ट्रेक पावसाळ्यात कठीण व अतिकठीण होऊन बसतो तो येथील रस्त्यामुळे. सध्या मातीचा व दगडांचा कच्चा रस्ता आहे. मधे आधे काही ठिकाणी डांबरी रोड तयार केलेला आहे. मात्र, काही किलोमीटर अंतर हे केवळ दगड धोंडे व कच्च्या मातीचा बनलेला आहे. जो पावसाळ्यात चिखलमय, ओढ्याचे स्वरूप व तर अतिपावसात नदीचे स्वरूप प्राप्त करतो. या ठिकाणी दुचाकी घेऊन जाणाºयांचे अनेकवेळा अपघात सुद्धा झाले आहेत. त्यामुळे नवख्यांनी याठिकाणी अनुभवी मार्गदर्शनाशिवाय जाऊ नये किंवा जायचेच असेल तर पावसाळा संपल्यानंतर महिना भरानंतर जाणेच चांगले. अनेक पर्यटक येथील पर्यटनाला वाव मिळावा अधिक पर्यटक येथे यावेत यासाठी रस्ता चांगला करावा अशी मागणी करत असतात. परंतु हे ठिकाण रस्ता न झाल्याने अजूनतरी टिकून आहे. नाहीतर याचे सिंहगड, अंधारबन, ताम्हीणीतील देवकुंड धबधब्यासारखी माणसांची गर्दी वाढून अतिउत्साही पर्यटकांनी घाण केल्याचे दिसून येईल.
राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती ‘कातळदरा’ या नावाने ओळखली जाते. पावसाळयात दरीतून पडणाºया धबधब्यांचे सुंदर दृष्य दिसते. या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते. या नदीच्या पश्चिमेकडील डोंगराला भैरोबाचा डोंगर म्हणतात. किल्ल्याला पूर्व आणि दक्षिण दिशांना खोल दरी आहे. नदीच्या पश्चिमेकडील डोंगराला ‘भैरव डोंगर’ म्हणतात. बहुतेकदा कताळधार धबधब्याचे भव्य दृश्य पाहण्यासाठी भेट दिली जाते.

IMG_20260219_134123.jpgगडावर दिसणारा परिसर :
किल्ल्यावरून आजुबाजुचा दिसणारा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. वातावरण चांगले असल्यास माणिकगड, कर्नाळा, सोनगिरी, माथेरान, सोंडाई, ईशाळगड दिसतात. तसेच बालेकिल्यावरून पूर्वेला शिरोटा जलाशय दिसतो. जांभवली गाव त्याच्या खाली असलेले कोंढेश्वर मंदिराचा हा परिसर. आग्नेयला तुंगार्ली राजमाची-वळवंड मार्ग, नैऋत्येला नागफणी, समोर बोरघाटातला रेल्वे मार्ग, व सध्याचा एक्सप्रेस हायवे दिसतो. ढाकचा बहिरी, मांजर सुंभ्या दिसतो. तसेच उजवीकडे भीमाशंकर, पदरगड , कोथळीगड दिसतात. या शिवाय लोणावळ्यातील ड्युक्स नोज (नागफणी), तुंगी दुर्ग दिसतात. कातळधार धबधब्याचा मार्ग दिसतो. राजमाची किल्ला आणि आसपासचा परिसर पाहण्यासारखा आहे. योद्ध्याचे स्मारक, दरवाजाचे अवशेष, गणपती आणि मारुतीरायाची मूर्ती, अर्धवट तुटलेली तटबंदी आपल्याला एकदम पुरातन काळात घेऊन जाते.

IMG_20260219_130718.jpgकाही आठवणी :
सुमारे २५ वर्षांपूर्वी दर हिवाळा व पावसाळ्यात आवर्जुन हिंडण्यासाठी मी येथे यायचो. तेव्हा लोकलने लोणावळ्यात उतरून तुंगार्ली धरणाच्या भिंतीशेजारून ३ ते ४ तास चालत उधेवाडीत यायचो. प्रचंड तंगडतोड व्हायची. मग कधी कोंढाणे लेणी पाहून कर्जत मार्गे घरी यायचो तर. कधी ढाकच्या मार्गे जांभवली गावातून एसटीने घरी यायचो मजा यायची. किल्यावरचा मुक्काम संपला की आमच्याकडेचे उरलेले साहित्य जसे की काडेपेटी, रॉकेल, मेणबत्ती, कांदे, बटाटे, शिदा तेथील ग्रामस्थांकडे द्यायचो. कारण येथे किरकोळ वाटणारे हे साहित्य तेथील लोकांना मिळण्यासाठी १५ किलोमीटरची पायपीट करावी लागत असे. आता तर फोर व्हीलर, टू व्हिलर थेट पायथ्यापर्यंत येता येते. पैसे घेऊन कॅम्प सुरू आहेत. फक्त एन्जॉयमेंट बाकी काही नको... वेडेवाकडे तोंड करून फोटो, रिल्स तयार करून आम्ही फोर्ट पाहून आल्याचे सांगायचे....

पर्यटकांसाठी सूचना :
अनेकजण तटबंदी शेजारी उभे राहून फोटो सेशन करत असतात. गवत वाढलेले असते. तटबंदीवरून जोरात पळत, चालत जाऊन व्हिडोओ शूट करत असतात. या तटबंदीच्या चिºयांमध्ये मोकळी जागा निर्माण झाल्याने अनेक साप, विंचू या फटींमध्ये जाऊन घरे करतात. भले माणसांची चाहुल लागताच ते आत जातात परंतु प्रसंगी एखादा वाईट प्रसंगही घडू शकतो. तेव्हा जरा जपूनच....

दहाच मिनिटांत किल्याच्या धान्य कोठार किंवा दारूगोळा कोठार असलेल्या एका मोठ्या गुहेशेजारी पोहाचलो. या ठिकाणी तीन कोठार असून, २५ वर्षांपूर्वी याच ठिकाणी आम्ही रात्रीचा मुक्काम करायचो. येथून समोर जुना पुणे-मुंबई रस्ता, बोगदा व रेल्वे दिसते. रात्री अंधारात चकाकणारे गाड्यांचे दिवे सुंदर दिसतात. तेथून पुढे गडाच्या सर्वांत उंच असलेल्या ठिकाणी गड पाहण्यास निघालो. वाटेत अनेक ठिकाणी पाण्याची टाकी आहेत. परंतु सध्या वापराअभावी ती खराब झाली आहेत. गडा पाहून समोरच असलेला मनरंजन आम्हाला खुणावत होता. परंतु वेळेअभावी फक्त श्रीवर्धनलाच भेट देऊ शकलो.

इतिहास :
सातवाहन काळापासून प्राचीन घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या डोंगरावर दुर्गाची निर्मिती करण्यात आली. कल्याण, नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे. या बंदरापासून बोरघाटमार्गे पुण्याकडे जाणारा हा प्राचीन व्यापारी मार्ग. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाºया किल्ल्यांचा उपयोग केला जात असे. राजमाचीच्या एका बाजूस पवनमावळातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिध्दगड असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे एक लष्करी प्रमुख ठाणं असावे. किल्ल्याच्या पश्चिमेकडे बौध्द लेणं आहे. याला ‘कोंढाणे लेणी’ असे म्हणतात. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसºया शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवातीला खोदलेली आहेत. किल्ल्याने सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूल, यादव, कदंब, बहमनी, आदिलशाही, शिवशाही, पेशवाई या राजवटी पाहिल्या.
राजमाचीला किल्ल्यास कोकणचा दरवाजा देखील म्हटले जाते. कल्याणच्या १६५७ च्या स्वारीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची, लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर स्वराज्यात दाखल करून घेतले. इसवी सन १७०४ मध्ये औरंगजेबाच्या सेनापतीने हा गड जिंकला पण औरंगजेबाची पाठ फिरताच मराठयÞांनी राजमाचीवर पुन्हा भगवा फडकवला. यानंतर १७१३ मध्ये शाहुमहाराजांनी कान्होजी आंग्रेना हा किल्ला दिला. सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. पानिपतानंतर भाऊसाहेब पेशव्यांचा तोतयाचा येथे काही काळ आश्रय होता. पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला. भारत सरकारने या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. हा किल्ला पाहण्यासाठी किमान दोन दिवस वेळ काढणे गरजेचे आहे. श्रीवर्धन आणि मनरंजन किल्ल्यांच्या मध्ये आपण डावीकडे जाणारी वाटेने मनरंजन आणि उजवीकडच्या वाटेने श्रीवर्धन किल्ल्यावर जाता येते. याच दोन्ही किल्लयांच्या मधोमध भैरवनाथाचे मंदिर आहे. मंदिरात भैरव आणि जोगेश्वरीच्या दगडी मूर्ती असून छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज आणि थोरले बाजीराव पेशवे यांनी वेगवेगळयÞा काळात त्या अर्पण केलेल्या आहेत. मंदिरासमोर दोन भग्न तोफा ठेवलेल्या आहेत. याशिवाय मंदिरासमोरच्या ३ दिपमाळा भोवतीने काही कोरीव शिल्पंदेखील आहेत. यातील गजान्तलक्ष्मीचे शिल्प पाहण्यासारखे आहे.
श्रीवर्धन हा राजमाची किल्ल्यातील दोन बालेकिल्ल्यांपैकी सर्वात उंच आहे.श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बºयापैकी चांगल्या स्थितीत आहेत.अवशेषांवरून असे दिसून येते की किल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी असावी.दरवाजाची कमान बºयापैकी शाबूत आहे आणि दरवाजाच्या बाजुला पहारेर्क­यांच्या देवड्या आहेत.किल्ल्याकडे जाणाºया मार्गावरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत. ही गुहा दारुगोळ्याचे कोठार म्हणून वापरली जात होती.बालेकिल्ल्याच्या माथ्यावर एक ध्वजस्तंभ आहे.समोरच ढाकबहिरीचा चित्तथरारक सुळका आणि त्याच्या उजव्या बाजुला शिरोट्याचा नयनरम्य तलाव दिसतो.

काही सूचना :
शक्यतो आॅक्टोबर ते जानेवारी पर्यंत किल्ल्याला भेट द्या. कारण पावसाळ्यात येथे येणे कठीण होते. रस्ते पूर्णपणे पावसाच्या पाण्याखाली गेलेले असतात. सर्वत्र धुके असते. पावसाळ्यात इथे प्रचंड पाऊस असतो. काही ठिकाणी आपले पाय गुढग्या इतक्या चिखलात जातात. खूप वर्षांपूर्वी उन्हाळा, पावसाळा, रात्री व दिवसा येथे ट्रेक केलेले असल्याने त्या वेळची आठवण येते. उन्हाळा संपता संपता इथे आलात तर आपल्याला खूप प्रमाणात करवंद खाण्यास मिळतील.

कसे यावे :
राजमाची हा किल्ला झाडाझुडपांनी आणि निसर्गरम्य हिरवाईने वेढलेला आहे. राजमाची किल्ल्याची समुद्रसपाटी पासूनची उंची सुमारे २७०० फुट आहे. येथे आपण दोन मार्गाने भेट देऊ शकतो.
पहिला मार्ग म्हणजे कर्जतहून कोंडीवडे या गावात बसने अथवा रिक्षेने यावे तेथून कोंडिवडे येथून खरवंडी मार्गे किल्यावर जाणारी पाउलवाटेने उधेवाडीत पोहोचण्यास सुमारे ३ ते ४ तास लागतात.
दुसरा सोपा मार्ग म्हणजे लोणावळ्याहून कुणे नामा (जुना पुणे मुंबई रस्ता) मार्गे उधेवाडी गावात यावे. ही वाट एकदंर १० ते १२ कि.मी ची आहे. या वाटेने स्वत:चे वाहन घेऊन गेल्यास १ ते १.३० तास लागतो. पण स्कुटर आणू नको. मोठी बाईक चालते. कार सुद्धा मोठ्या चाकांची असायला हवी. अन्यथा अडचण येऊ शकते.

राहण्याची व्यवस्था :
उधेवाडी हे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले एक छोटेसे गाव. गावात सध्याच्या भाषेत सांगायचे तर होम स्टे आहेत जिथे तुम्ही राहू शकता. या शिवाय स्वतंत्र्य टेन्ट लावून देखील व्यवस्था होऊ शकते. भैरवनाथ मंदिर देखील राहू शकता. या शिवाय श्रीवर्धन किल्ल्यावर धान्य कोठार किंवा दारूगोळा कोठार आहे. जिथे तुम्ही राहू शकता. हे कोठार मोठे असून, येथे ३ कोठार आहे.

https://ferfatka.blogspot.com



















































Sunday, February 1, 2026

भोरगिरी ते भिमाशंकर, नव्या वाटेने

 भोरगिरीहून भिमाशंकरला जायला रुळलेली आणि लोकप्रिय वाट आहे. पण आमचा प्लॅन वेगळा होता: भोरगिरीच्या नैऋत्येला डोंगरावर येळवली नावाचं गाव आहे. मागे एकदा खेतोबाला जाताना त्या गावातूनच गेलो होतो. तर यावेळी आधी येळवली गाठायचं, आणि मग कमळजाई मंदिर, आणि मग तिथून भिमाशंकरला जायचं, असा बेत होता. नीट पायवाट आहे. गुप्त भिमाशंकर मार्गे.

पण भोरगिरीला पोचलो तेव्हा कळलं की येळवलीपर्यंत चांगला डांबरी रस्ता झाला आहे. हा अजून तरी (म्हणजे जानेवारी २०२६ मध्ये) Google Maps मध्ये दिसत नाही, पण रस्ता छान तयार झाला आहे. मग डांबरी रस्त्याने कशाला चालायचं? म्हणून ड्रायव्हरला म्हणलं चल पुढं. येळवलीला उतरलो.

म्हणजे खरं तर येळवली ते भिमाशंकर ट्रेक झाला असं म्हणलं पाहिजे. चित्रात ट्रेकचा पूर्ण प्रदेश आहे: खालच्या उजव्या कोपऱ्यात येळवली आणि वरच्या कडेजवळ भिमाशंकर.
trek_area.jpg

ड्रायव्हरला समजावून सांगितलं की बाबा तू आता भिमाशंकरला जा. सुमारे २५ किमी. आणि तिथे आमची वाट बघ. आम्ही तिथे चालत येऊ. गाडी असताना आम्ही २५ किमी चालत का येणार हे त्याला कळेना. खरं तर आम्ही जेमतेम १० किमी चालणार आहोत, जंगलातून, हे त्याला कसंबसं समजावलं.

मग चालू लागलो. कमळजाई मंदिराकडे. फोनला सिग्नल नव्हता. पण Google Maps ची offline map सुविधा अशा ठिकाणी उपयोगी पडते.

येळवली गाव हे भिमाशंकरच्या पठारावरच आहे. संपूर्ण पठारावर जंगलाचे तुकडे आहेत. कोणत्याही दिशेनी सरळ चालत राहिलो तर दर थोड्या वेळानी आपण जंगलात घुसतो आणि आणखी थोड्या वेळानी जंगलातून बाहेत पडतो. पण तसं करणं अर्थातच सोयीचं नाही आणि सोपं पण नाही. त्यापेक्षा जंगल तुकडयाच्या कडेकडेने जाणं सोपं. अशा दोन वाटा आपल्याला येळवली पासून कमळजाई मंदिरापर्यंत घेऊन जातात:
Yelavali_to_Kamaljai_2_ways.jpg

आम्ही पिवळ्या ठिपक्यांच्या मार्गाने गेलो. १५ मिनिटातच पोचलो. अगदी छोटंसं मंदिर. पण सुंदर परिसर. या ठिकाणी यायची ही तिसरी वेळ. तिन्ही वेळी संपूर्ण परिसरात आम्हीच तेवढे मनुष्यप्राणी होतो. मंदिराजवळच एक छोटासा आडोसा नवीनच बांधलेला दिसला - बहुधा वन खात्याने. तिथे निवांत बसलो. पुढे कसं जायचं हे ठरवायला.

इथून थेट उत्तरेकडे जाणारी रुळलेली पायवाट दोनेक तासात आपल्याला भिमाशंकरला पोचवते. त्या सरळ सोप्या वाटेने मागे एकदा येळवलीतील ग्रामस्थांसोबत गेलेलो होतो. त्याच वाटेने आजही जाऊ शकतो. असं मी म्हणलं खरं, पण मी फारसा सरळ मार्गी नाही हे बाकी तिघांनाही ठाऊक होतं. इतक्या साध्या आणि सरळ मार्गानी आपण जाणार हे कसे? म्हणून मग वेगळा प्रस्ताव दिला:

न मळलेली, आणि थोडीशी जंगलातून जाणारी वाट शोधली तर आपण कदाचित थेट नागफणीला जाऊ शकू. कडयाच्या काठाकाठानी. अन मग तिथून भिमाशंकरला जायची तर रीतसर वाट आहेच. जाऊन बघूयात का?

सुर्या आणि भरत आंध्र प्रदेशातले तर राम तामिळनाडूचा. त्यांना इथला भूगोल फारसा माहिती नाही. त्यात महाराष्ट्रात बिबट्यांच्या बातम्या हल्ली नेहेमीच ऐकायला येतात. त्यामुळे त्यांना थोडी anxiety असणं साहजिक होतं.

हे बघ, जंगलाचा कोणताही तुकडा २०० - फार तर ३०० मीटर पेक्षा जास्त रुंद नाहीये. म्हणजे पायवाट नसलीच तरी जास्तीत जास्त ३०० मीटर झाडाझुडुपात घुसून जायला लागेल. जंगल तुकड्यातुन बाहेर आलो की मग सोपंच आहे. पुढच्या जंगल तुकड्यात घुसेपर्यंत.

आणि अगदीच नाही जमलं, तर backtrack करून पुन्हा इथे येऊ, आणि मग शहाण्यासारखे रुळलेल्या वाटेने जाऊ. काहीही झालं तरी अंधार पडायच्या आधी आपण नक्कीच पोचू भिमाशंकरला.

हे शेवटचं वाक्य आश्वासक ठरलं. वेगळी वाट वर शिक्कामोर्तब झालं.

त्यानुसार उत्तरेऐवजी वायव्येला निघालो. त्या दिशेनीपण एक छान पायवाट जात होती. तीच धरली मग. आश्चर्य म्हणजे या ठिकाणी ती जंगलात घुसत होती: (गुगल मॅप्स ची लिंक आहे)
https://maps.app.goo.gl/aCmLFLLStbAVu4ubA

जणू काही आमच्याच साठी कुणी वाट तयार केली होती. मग तर आम्ही निश्चिन्तपणे झाडीत शिरलो. सुरेख, नैसर्गिक जंगल. त्यात काही अशी लक्षणीय पानं:
eyes_edited.jpg

काही ठिकाणी शेण पडलेलं होतं, म्हणजे ही गुरांची वाट असणार.
path_through_forest_edited2.jpg

रमतगमत ५ मिनिटात आम्ही पहिल्या जंगल तुकड्यातुन बाहेरही आलो. साधारणपणे इथे:
https://maps.app.goo.gl/hpkZpeP8omP6JpS18

पुढे तर गवताळ माळ होता. थोडा उंचसखल होता. अंधुकशी पायवाट दिसत होती, तिला धरूनच जात राहिलो.
आता भरतची बडबड आणि तेलगू गाणी सुरु झाली. मजा होती.
वाट किंचित डावीकडे वळून उंच चढू लागली. काही मिनिटातच आम्ही वर पोचलो. पश्चिमेकडे दरी आणि कोकणाचे पहिले दर्शन झाले. अर्थातच फोटो घेणं सुरु झालं.

वायव्येकडे पदरगडाचा दक्षिण कडा दिसत होता. त्याच्या २-३ सुळक्यांसहित (बाण बघा).
Padargad_from_south_with_arrow.JPG

लांबवर गावं अंधुक दिसत होती, कारण हवा धुरकट (hazy) होती.
राजपे गावापासून वर चढणारी आंबेनळी घाटाची वाट कमळजाईच्या पठारावर जिथे पोचते तो भागही दिसत होता. त्या वाटेने चढायचा एक प्रयत्न २ वर्षांपूर्वी अयशस्वी झाला होता. ती आठवण आणि बोच पुन्हा जागी झाली. पुन्हा एकदा जाऊन बघू असं ठरलं खरं पण ते कधी होईल कोण जाणे.

ते असो. आता आज पुढे कसं जायचं हे बघायला हवं.

गूगल मॅप्सच्या सॅटेलाईट व्ह्यू किंवा टेरेन व्ह्यूवरून जमिनीच्या उंचसखलपणाची थोडी कल्पना येते, पण प्रत्यक्ष परिस्थिती त्यापेक्षा बरीच वेगळी असू शकते. त्यात जो थोडासा चढ / उतार वाटतो, तो प्रत्यक्षात पुष्कळ जास्त असू शकतो. त्याचाच प्रत्यय इथे आला. नकाशा पाहून वाटलं होतं की इथपासून नागफणीपर्यंत सलग, सौम्य चढ आहे. पण आता दिसलं की प्रत्यक्षात बराच उतार पण आहे, आणि म्हणूनच त्यापुढे पुष्कळ चढपण आहे.

पण आता डावीकडे दरी दिसते आहे म्हणून छान वाटत होतं. अंधुक वाट धरून उत्तरेकडे जात राहिलो. थोड्या वेळानी उतार सुरु झाला. त्यात वाटेच्या कडेला काटेरी झुडुपं वाढलेली होती. ते काटे पॅन्टमध्ये घुसू लागले. पण ट्रेकला गेल्यावर या गोष्टींची तक्रार कोणी करत नाही. तक्रार करायचं ठरवलं तरी कुणाकडे हा प्रश्नच. तेव्हा चालत रहा पुढे तसेच…
उतार संपता संपता पुन्हा झाडी सुरु झाली. पण वाट दिसत होती. लगेचच पुन्हा चढण. जेवढं उतरलो त्याच्या दुप्पटीपेक्षा जास्त वर चढलो.

कमळजाई ते भिमाशंकरच्या रुळलेल्या वाटेपासून फार दूर आम्ही अजून गेलो नव्हतो. ती वाट आमच्या २०० किंवा ३०० मीटरच अंतरावर असेल, पूर्वेकडे. अर्थात मध्ये जंगल असल्यामुळे ती वाट दिसत नव्हती. पण आता आम्ही डावीकडे वळलो आणि त्या वाटेपासून हळू हळू दूर जाऊ लागलो.

इथपासून एक अंधुक वाट सरळ पश्चिमेकडे जात होती. तिकडे चालायला लागलो. पण लवकरच त्याला उजवीकडे एक फाटा फुटून तो जंगलात घुसत होता. नकाशात बघितलं तर नागफणी बरंच उत्तरेकडे आणि किंचित पश्चिमेला होतं. म्हणून मग आम्ही उजवीकडे वळून पुन्हा जंगलात घुसलो. इथे:
https://maps.app.goo.gl/wFRpn1tYCv874EZM7

आणि २-३ मिनिटात पलीकडे बाहेरही पडलो: https://maps.app.goo.gl/S9fUxCXyvjPniZ9N6

आणि अनपेक्षित दृश्य दिसलं. पुढच्या मोकळ्या पठारावर गुरं चरत होती. खूप मोठा कळप होता. आमचा आवाज ऐकून त्यातली बरीच गुरं मान उंचावून आमच्याकडे बघू लागली.

जंगलात अचानक वाघ समोर आला तर कुणाचीही घाबरगुंडी उडणं साहजिक आहे. पण आम्ही तर त्या गायींनाच घाबरलो. अचानक अनेक गायी चरणे थांबवून आपल्याकडे टकमक बघू लागल्या तर … नक्की भीती वाटते. आम्ही थबकलो. पुढं जावं की नाही प्रश्नच पडला. आम्ही अर्थातच त्या गायींना कसलाही त्रास देऊ इच्छित नव्हतो. पण हे त्यांना समजलं पाहिजे नं. गुरांचा मालक असता तर त्याला सांगता आलं असतं का बुवा आम्हाला जाऊ दे. पण माणूस कुणीच नाही. कुणी तरी सकाळी लवकर गुरांना इथे चरायला सोडून गेलं असणार. पण आमची पंचाईत झाली त्याचं काय?

सुदैवानी काही सेकंदात आम्ही अगदी निरूप्रदवी प्राणी आहोत हे गायींनीच ओळखलं. पुन्हा खाली मान घालून चरायला लागल्या. तरी पण धोका नको म्हणून आम्ही त्यांच्यापासून शक्य तेवढं अंतर सोडून पटपट, न बोलता पुढे जात राहिलो. २ मिनिटात पूर्ण कळप ओलांडून पुढे गेलो. हुश्श!

कमळजाई मंदिरापासून इथपर्यंत सतत अंधुक वाट का दिसत होती याचा आता उलगडा झाला. गुरांची चरायला जायची ही रोजची वाट असणार.

तीच अंधुक वाट धरून पुढे जात राहिलो. लवकरच फाटा होता, इथे: https://maps.app.goo.gl/gu9MN91wrhGtbSno9

डावी-उजवी दोन्ही वाटा अंधूकच होत्या.
नागफणीची दिशा घ्यावी म्हणून आम्ही उजवी वाट धरली. पण वाट जास्तच अंधुक होऊ लागली. आणि तिने आम्हाला कसेबसे इथे आणून पोचवले: https://maps.app.goo.gl/dD3kGPtsQ5pJjeKX9
त्यापुढे मात्र अंधुक सुद्धा वाट नव्हती. आता जरा प्रश्न निर्माण झाला. डावीकडे गेलो तर आपण कड्याच्या डोक्यावर पोचू आणि मग कडयाच्या कडेकडेने नागफणीकडे जाऊ शकू असं वाटत होतं. पण डावीकडची झाडी अगदी घट्ट होती. आत घुसायला कुठेच जागा दिसेना.
डावीकडे आणि उजवीकडे गर्द झाडी आणि मधून एक कोरडा ओढा होता. ओढ्यातून पुढे जाणं शक्य दिसत होतं , पण बऱ्याचवेळा पुढे जाऊन ओढ्याची वाट बंद होऊ शकते. कधी दोहीकडची झाडी ओणवून ओढ्यात उतरलेली असते, नाही तर कधी धबधब्याची भिंत समोर येते.
शेवटी काहीच पर्याय नाही म्हणून ओढ्यात घुसलो, इथे: https://maps.app.goo.gl/XPxZeoU93atRq1ANA
ओढ्यातून पुढे पुढे जाऊ लागलो. जी भीती होती ती दोनच मिनिटात खरी ठरली: पुढे उभ्या भिंतीसारखा खडक होता. पावसाळ्यात सुरेख धबधबा असणार इथे. खडकाची भिंत चढून जाणं काही शक्य नव्हतं. आता?
एक मात्र झालं. ओढ्यात घुसायच्या आधी डावीकडे झाडी जेवढी गर्द होती, त्यामानाने इथे थोडी कमी गर्द होती. म्हणजे डावीकडे घुसणे कसेबसे जमले असते. मग घुसलोच.
पण ते एवढं सोपं नव्हतं. पायाखाली घट्ट जमीन नव्हती तिथे. छोटे मोठे दगड होते, पण ते जमिनीत रुतलेले नव्हते. पाय दिला की हलायचे. झाडांचा आधार घेत कसेबसे जात राहिलो. थोड्या वेळानी झाडी संपली. नुसतीच सैल माती आणि दगड. मग तर पुढे जाणं अशक्यच झालं. आणि तिथे चढ इतका तीव्र होता की एका जागी उभं पण राहता येत नव्हतं. मग इकडे तिकडे बघून टेहळणी करणं तर सोडाच. शेवटी माघार घ्यायचा निर्णय घेतला. घसरत घसरत कसेबसे पुन्हा कोरड्या ओढ्यात येऊन पोचलो.

आता पुढे काय? हे ठरवण्याआधी जेवण करायचं ठरलं. कारण भूक तर केव्हाचीच लागली होती.
पुढची काही मिनिटं शांततेत गेली. तोंडं फक्त खाण्याचं काम करत होती. ब्रेड, पीनट बटर, चीज स्लायसेस, बाकरवडी. नुसतं जंक फूड काय खाताय असं कुणी म्हणू नये म्हणून केळी, सफरचंदही होतीच.

जठराग्नी शांत झाल्यावर मग प्रश्न लगेचच सुटला. आम्ही डावीकडच्या झाडीत घुसून अयशस्वी होऊन परत आलो होतो. पण उजवीकडची झाडी मात्र सोपी वाटत होती. एक तर त्याबाजूला चढाची तीव्रता थोडी कमी होती. आणि मोकळे दगड नव्हते, त्यामुळे पाय घट्ट रोवणं शक्य दिसत होतं. अरेच्चा! आपण आधीच उजवीकडे का नाही बघितलं?
पण तरी एक प्रश्न होताच. नागफणी आणि कडा तर डावीकडे होता. उजवीकडे नाही. मग असं ठरलं की उजव्या बाजूनी वर चढायचं, पण नंतर पुन्हा वळून ओढ्याच्या दिशेलाच जायचं. ओढ्याच्या शक्य तितक्या जवळनंच जायचं.
केली मग सुरुवात. थोडं वर गेल्यावर लक्षात आलं की आता आम्ही कोरड्या धबधब्याच्या भिंतीपेक्षा जास्त उंचावर आलो आहोत. मग लगेच वळून पुन्हा ओढा गाठला. भिंतीच्या वर. मग थेट ओढ्यातूनच चालायला लागलो. थोड्या वेळानी पुढे झाडीतून निळ्या आकाशाचे तुकडे दिसू लागले.
about_to_exit_forest_small.jpg

म्हणजे जंगल तुकड्यातुन बाहेर पडणार लवकरच.
बघता बघता इथे बाहेर पडलो: https://maps.app.goo.gl/Zg5fHHGmoFxbm3nB6

आता डावीकडे चढण होती. पाच मिनिटात ती चढून कड्याच्या डोक्यावर पोचलो, इथे: https://maps.app.goo.gl/AEupERbhobimPXTN6

म्हणजे जवळ जवळ जमलंच म्हणा की! नकाशानुसार इथून नागफणी काही फार दूर नव्हतं. शिवाय आता पश्चिमेकडे दरी आणि कोंकण पुन्हा एकदा दिसायला लागलं. अहाहा! ऐन दुपारचं ऊन असलं तरी गार वाऱ्यामुळे छान वाटत होतं. पुष्कळ वेळ तिथेच बसलो मग.

इथून उत्तरेकडे दरीच्या काठानीच चालत राहिलो तर नागफणीला पोचू असं अपेक्षित होतं. पण उत्तरेकडे एक टेकाड दिसत होतं. ते टेकाड चढायला लागलो मग. टेकाडावर पोचताच दूरवर नागफणी दिसायला लागलं की! भिमाशंकरला येणारे बरेच भाविक नागफणीला पण येतात. म्हणून सुरक्षेसाठी तिथे लोखंडी पायपांचा कठडा बांधलेला आहे. तो दिसू लागला.
भिमाशंकरच्या पश्चिमेला कड्याच्या सर्वोच्च ठिकाणी आम्ही उभे होतो!
मघाशी दक्षिणेकडून बघितलेला पदरगड आता उत्तरेकडून बघत होतो:
Padargad_from_north_small.jpg

पुढे नागफणीकडे जाणारी वाट अशी होती:
path_by_the_cliffside_small.jpg

खाली पदरवाडी आणि त्याच्याही खाली कोंकण:
padar_and_konkan_small.jpg

आणखी थोडं पुढे गेल्यावर नागफणीचा कडा सुरेख दिसत होता:
Nagphani_cliff_small.jpg

थोडं दक्षिणेकडे बघितलं तर पेठचा कोथळीगड खूप अंधुक दिसत होता, घंटेसारख्या आकाराचा:
Kothaligad.jpeg

बघता बघता नागफणीला पोचलो देखील. तेव्हा मग थोडी विश्रांती घ्यायचा मोह आवरला नाही. कुणी झोपून, तर कुणी नुसतं बसून:
Rest_small.jpgRest2.jpeg

मागे वळून बघितलं तर आम्ही ज्या कड्याच्या काठानी आलो तो कडा आणि डावीकडे हनुमान मंदिर छोटंसं दिसत होतं:
Nagphani_and_Hanuman_temple_small.jpg

आता इथून पुढे भिमाशंकरला जायला चांगली रुळलेली वाट होती. त्यामुळे ट्रेक इथे पूर्ण झाला. तेव्हा एक सेल्फी काढणं अटळ:
Team1.jpeg

लोक भिमाशंकरला जातात, आणि मग वेळ आणि हौस असेल तर नागफणीला भेट देतात. आम्ही आधी नागफणीला पोचलो आणि मग भिमाशंकरला. असा आमचा उफराटा ट्रेक आनंदात पार पडला.

समाप्त







































Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...