Friday, June 30, 2023

दाभिळ टोक ते अर्थर-सीट... एक थ्रीलींग अनुभव

 http://murkhanand.blogspot.com/2010/07/blog-post.html

चला! सकाळी ६.३० ची स्वारगेट - वेल्हा - घिसर बस मिळाली... आता घिसरला उतरायचं... समोरची डोंगररांग चढून मोहरी आणी मग सिंगापूर... सिंगापूरला मुक्काम करायचा आणि दुसर्‍या दिवशी पहाटे सिंगापूर-नाळेनं खाली कोकणात उतरुन पुण्याला परत...

"मास्तर, ३ घिसर द्या..."
"पावसात घिसर पर्यंत जात नाही बस..."
"कुठ पर्यंत जाते मग?"
"विहिर... त्यापुढं नाही जात..."

काय करायचं आता?... विहिर पासून चालत घिसरला जायचं म्हणजे १७-१८ कि.मी. चालावं लागणार... त्यात ४ तास तरी जाणार...

"सध्या वेल्ह्या पर्यंतच तिकिट द्या..."

तिकिटं काढली आणि आता काय करावं ह्यावर आमच्यात विचार सुरु झाले... बरच काही सुचत होतं आणि तितक्यात "ढवळ्याहून अर्थर-सीट करायचा का?" असं स्वानंद म्हणाला...




"ह्या पावसात जायचं तिथे?... दाट रान... अवघड वाट... पाऊस आणि धुक्यामुळे अजूनच अवघड होणार... ट्रेक पुर्ण होईल का?" असा विचार माझ्या डोक्यात आला...

"जाऊत रे... आता नाहीतर कधी करणार मग..." असं स्वानंद आणि यशदीप दोघं एकदमच म्हणाले... मग काय? नसरापुर फाट्याला बस सोडली आणि ट्रकनं वाई फाटा आणि मग बसनं महाबळेश्वरला पोहचलो... पोलादपुरची बस पकडली आणि आंबेनळी घाटात वाडा-कुंभरोशीच्या जरा पुढे दाभिळ-टोकाला उतरलो... पाऊस नव्हता, पण वातावरण ढगाळ होतं... समोर दूरवर मंगळगड दिसत होता...

(एकदम मागच्या रांगेत डावीकडून ३रा डाँगर म्हणजे मंगळगड (कांगोरी गड)...)


सावित्रीचं खोरं न्याहाळत सोंडेवरुन उतरायला लागलो... साधारण १.५ तासात सावित्री नदीच्या काठी पोहचलो... गार नितळ पाण्यात डूंबलो आणि समोरचा चढ चढून कंरजे गावात पोहचलो...

(सावित्री नदी...)


गावामागची खिंड पार करुन ढवळ्याला जाणार्‍या डांबरी रस्त्यावर उतरलो...

(करंजे खिंड चढताना दिसणारं सावित्रीचं खोरं...)


ह्या रस्त्याच्या कडेलाच एक मोठ्ठा धबधबा कोसळतो... सध्या त्यात पाणी कमीच होतं, पण जोराचा पाऊस झाला की हा धबधबा बघण्यासारखा असतो...



इथून साधारण अर्ध्या तासात ढवळं गाठलं...

(डोंगराच्या कुशीत वसलेलं ढवळं...)


शाळेच्या पडवीत मुक्काम मांडला... घरुन आणलेलं खाल्लं आणि लवकरच झोपी गेलो... रात्री २ वाजता जाग आली आणि असंच जरा चक्कर मारायला बाहेर पडलो तर एक अजबच नजारा अनुभवला... करोडो काजवे दरीमधे, झाडावरती चमकत होते... केवळ अप्रतिम... आणि काजवे सारखे जागा बदलत असल्यामुळे तो देखावा अजूनच मनोहर दिसत होता... थोडावेळ निसर्गाचा हा चमत्कार अनुभवला आणि परत झोपी गेलो...

पहाटे लवकर उठून सामान आवरलं आणि ७ वाजता चालायला सुरुवात केली... पुढची वाट दाट रानातून जाते आणि शेवट पर्यंत बहिरीची घुमटी किंवा आर्थर सीट दिसत नाही... एकदा जंगलात शिरलो की आपण नक्की कुठे आहोत आणि आपल्याला नक्की कुठे जायचय हे नीटसं कळत नाही... वाट चुकली तर आर्थर सीटला पोहचणं जवळ-जवळ अशक्यच आहे... उन्हाळ्यात एकदा मी ह्या वाटेने गेलो होतो, पण आता पावसात जरा अवघडच जाणार ह्याची खात्री होती... सोबत कोणी वाटाड्यापण घेतला नाही... ढवळ्याच्या जरा पुढं कोळ्यांचा वाडा लागतो, तो पार केला आणि जंगलात शिरलो... कोणत्याही मानव वस्तीतून जंगलात असंख्य वाटा शिरतात आणि सगळ्याच वाटा मळलेल्या असतात आणि नेमकं अश्या वेळीच चुकीची वाट पकडली जाते... आज आमचं पण असंच झालं... चुकीच्या वाटेवर वीसेक मिनीटं चालल्यावर कळालं की आपण चंद्रागडाच्या जरा जास्तच जवळ जातोय... माघारी वळलो आणि बरोबर वाट शोधून गाढव-माळला पोहचण्यात साधारण दिड तास लागला... गाढव-माळ म्हणजे कोळ्यांच्या वाड्यापासून जवळच असणारं लहानंस पठार...

(गाढव-माळ इथून दिसणारा देखावा...)


जंगल अनुभवायचं तर ते पावसात किंवा रात्री... दोन वर्षापुर्वी इथे आलो होतो तरी आता पावसात जंगल एकदमच अनोळखी वाटत होतं... पायाखाली ओल्या-पीकलेल्या पानांचा खच पडला होता... काही ठीकाणी झाडं उन्मळून पडल्यामुळे वाट एकदमच नाहीशी होत होती, पण जरा अंदाज घेत घेत शेवटी एका मोठ्या ओढ्यात पोहचलो... हा ओढा माझ्या चांगलाच लक्षात होता... ऑढ्याच्या उगमाकडे तोंड करुन उभे राहिलो की उजव्या हाताला चंद्रगड आणि  डाव्याहाताला अजून एक प्रचंड डोंगर आहे...

ओढा नितळ पाण्याने खळखळून वाहात होता... गार पाण्यात मस्त डुंबून घेतलं आणि ऑढ्याकाठी नाष्टा उरकला... तसं पाहिलं तर ओढ्यापर्यंत नीट वाट आहे, पण पावसामुळे जंगल माजलं होतं आणि वाट सारखी हरवत होती... आणि ओढ्याच्या पुढची वाट तर अजूनच अवघड होती आणि त्यात पाऊस आणि धुकं...

आता पुढची वाट ओढ्याच्या उजवीकडून की डावीकडून हे नीटसं आठवत नव्हतं... मग डावीकडूनच वाट शोधायला लागलो... वाळक्या कारवीच्या झुडपांमुळे काहीच अंदाज येत नव्हता आणि नविन कारवी पण कंबरभर माजली होती... वाट नसल्यामुळे सगळीकडे भटकून अंदाज घेत होतो... चढ खूपच तीव्र होता... एक ते दीड तास वाट शोधली, पण सापडलीच नाही... अजून ओढ्याच्या जवळच होतो... उजवीकडून वाट शोधावी म्हंटलतर तिथेपण दाट रान होतं आणि वाट दिसत नव्हती... मग ओढ्यातूनच वर जाऊयात असं ठरवलं आणि चढायला लागलो... `आता काय आपण वर पोहचत नाही' असं सारखं वाटत होतं... अश्या जागी योग्य वाट सापडली नाहीतर ठरलेल्या जागी पोहचणं जवळ-जवळ अशक्यच असतं... पण पुरेपुर प्रयत्न करायचेच असं ठरवून चढत होतो... "काहीही झालंतरी चालेल, पण आता माघार घ्यायची नाही" असं स्वानंद म्हणाला... वेळ पडलीच तर जंगलात रात्र काढूत, पण आता वर जायचंच...

(वाटेत ह्याच्याशी भेट झाली...)


प्रवाहाच्या विरुध्द ओढ्यातून चढताना मजा येत होती... न थाबंताच तासभर चढलो... ओढा संपला आणि उजवीकडे चढायला लागलो... अजून वाटेचा, अर्थर-सीटचा काहीच अंदाज येत नव्हता... अधून-मधून पाऊस पडतच होता... दमट वातावरणामुळे घाम पण तेवढाच निघत होता... वाटेच्या शोधात दमल्याची जाणिवच होत नव्हती... ओढा सोडून बराच वेळ चढत होतो... थोडावेळ थांबून घोटभर पाणी प्यायलो आणि पुन्हा चढायला लागलो... का कोणास ठावूक पण आता आपण वाटेवर आहोत असं वाटू लागलं... भरभर थोडं अंतर पार केलं आणि एकदमच वाट सापडली असं वाटू लागलं... तेवढ्यात दाट धूकं आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला... आम्ही सरळ रेषेत चढत होतो... ही तर दरड कोसळल्यामुळे झालेली वाट होती... तरी चढून गेलो, पण पुढे तर कातळकडा होता... माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता... जपून उतरलो... पावसात दरड कोसळलेल्या वाटेवरुन उतरणं खूपच रीस्की असंत... माघार घेऊन परत वाट शोधू लागलो तर उजव्या हाताला एक पुसटशी वाट कारवीच्या रोपांमधून पळताना दिसली... मगाशी वर चढताना धूक्यामुळे आणि समोर असलेल्या वाटेमुळे ह्या वाटेकडे लक्षच नाही गेलं...

(अनमोल मोत्याची माळ...)


"काय रे! किती टक्के वाटतयं की ही बरोबर वाट आहे म्हणून?" स्वानंदने मला विचारलं... म्हणालो निदान ९० टक्केतरी वाटतयं... त्या पुसटश्या, नागमोडी आणि अतिशय अरुंद वाटेवर अर्धा तास चालल्यावर लहानसा, सोपा कातळ-टप्पा लागला आणि आम्ही योग्य वाटेवर चालतोय ह्याची १०० टक्के  खात्री पटली... "चला! आता आपण पोहचणार..." असं तिघांना पण एकदमच वाटलं... धुकं होतच, पण आता नाकासमोरच्या वाटेवर निमुटपणे चालत होतो...   अर्धातास चालल्यावर वाट डावीकडे वळली आणि फारच ट्रीकी झाली... डाव्या हाताला साधारण पाच फुटांवर खोलदरी होती आणि जागोजागी पावसामुळे माती वाहून गेली होती आणि वाट बर्‍यापैकी अवघड झाली होती... मागचे ५-७ तास स्वानंदची खूप बडबड चालू होती, पण ह्या जागी त्याचं तोंड एकदमच बंद झालं होतं... त्याला थोड्याफार मदतीची गरज पडत होती आणि तिच गत यशदीपची होती... हे थोडंस अंतर पार करायला बराच वेळ लागला, पण सगळे सुखरुपपणे बहिरीच्या घुमटीला पोहचलो...



तिथे पोहचलो तेव्हा यशदीपच्या चेहर्‍यावरचे एक्सप्रेशन्स बघण्या सारखे होते... त्यात भिती, आनंद आणि समाधान सगळ एकदमच होतं... दुपारचे ३.३० वाजले होते... जास्त वेळ वाया घालवणं परवडण्या सारखं नव्हतं... पटपट भेळ केली, खाल्ली आणि अर्थर-सीटच्या दिशेने निघालो... बहिरीच्या घुमटीच्या इथून जोर ला देखील जाता येतं आणि ती वाट अर्थर-सीटच्या वाटेपेक्षा सोपी आहे... धुकं खूपच दाट होतं, त्यामुळे यशदीप म्हणाला "पश्या, जोरला जायचं का? अर्थर-सीटची वाट वेळेत नाही सापडली तर फार उशीर होईल..."
"खूप नाही ना दमलास... अजून वर्ट्स केस निदान ४ तास तरी चालशील ना?े" मी...
"हो..."
"मग चल... अर्थर-सीटलाच जाऊत..."

(धुकं, धुकं आणि दाट धुकं...)


परत दाट रानात पाऊल टाकलं... इथून पुढे अर्थर-सीटचा चढ प्रचंड तीव्र आहे... दमलो होतो, पण भर पावसात हा चढ चढताना मजा येत होती... तीव्र चढ संपला आणि मग जरा सपाटीवर चालायला लागलो... धुकं नसंल तर इथून अर्थर-सीट दिसतो... आता परत कारवी आणि बांबूच्या रानातून वाट काढत पुढे सरकत होतो... कधी-कधी वाट एकदम दरीच्या काठाला चिकटून जात होती... साधारण एक तासात शेवटच्या कातळ-टप्प्याजवळ पोहचलो... आधी स्वानंदला चढवला, मग यशदीपला आणि मग एक-एक करुन सगळ्या पाठपिशव्या चढवल्या... आता मात्र जाम दमलो होतो... अर्थर-सीट हाकेच्या अंतरावर होतं... मग शेवटचा थोडासा चढ संपवला आणि अर्थर-सीटवर पाय ठेवला... अहहहहा!!! काय ते समाधान? काय तो देखावा? आणि काय तो निवांतपणा?... मला ते शब्दात वर्णन करणं शक्यच नाही... पावसामुळे कोणीच पर्यटक नव्हते... दरीत दाट धुकं साठलं होतं आणि पाऊस चालूच होता... आज आम्ही अर्थर-सीटवर पोहचू असं मला खरंच वाटल नव्हतं, पण ते शक्य झालं... खूप खूप आनंद झाला होता... जग जिंकल्या सारखं वाटत होतं... अर्थर-सीट वरुन लीफ्ट मिळाली आणि वेळेत बस-स्थानकावर पोहचलो... ६.३० ची शेवटची पुण्याला जाणारी बस मिळाली... भिजलेल्या अवस्थेतच ३.३० तासांचा प्रवास करुन रात्री १०ला पुण्याला पोहचलो... बस मधे बरेच विचार डिक्यात घोळत होते... "असा वेडेपणा परत करणे नाही... देवाच्या कृपेने आज सुखरुप घरी परततोय..." हा विचार सारखा येत होता...

नोटः हा ट्रेक पावसात अजिबात करु नका... पावसा नंतर करण्या सारखा ट्रेक आहे, पण ढवळ्यातून वाटाड्या जरुर घ्यावा... उगीच अनाठायी धाडस करण्यात अर्थ नाही..

Wednesday, June 28, 2023

उनाड भटकंती : मढेघाट

 "रिम झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन

भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन"

रेडिओवर किशोर चिंब करत गात होता. तसं पाहायला गेलं तर गाण्यात अपेक्षित असलेली 'अगन' लागण्याची (आणि लागलीच तरी दाखवण्याची) आता फारशी संधी उरलेली नाहीये. पण हा पावसाळा तसा कोरडाच गेलेला होता. सद्ध्या ट्रेक्स तर पूर्णपणे बंदच झालेले आहेत. या वर्षी फारसे कुठे आऊटींगलाही जाणे झालेले नव्हते. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर कुठेतरी उंडगायला जावून पावसात मनसोक्त भिजायची 'अगन' मात्र मनात लागलेली होती. नुकताच आजारातून उठलेलो असल्यामुळे बाहेर कुठे जायला मिळेल याची शक्यता नव्हती. सौभाग्यवतींनी लगेच डोळे वटारले असते. त्यामुळे भर पावसाळ्यात उष्ण 'सुस्कारे' सोडत पडलो होतो. तितक्यात फोन वाजला. सौ.नीच उचलला...

'ओंकार' आहे, उपांड्याला जायचेका म्हणून विचारतोय? हा उपांड्या काय प्रकार आहे?

अगं घाट आहे उपांड्या, मढेघाटाच्या जवळ.

जाणार आहेस तू?

इच्छा तर आहे, पण....

ओंकार आहे बरोबर तेव्हा काही हरकत नाही. ( ओंकार पंचवाघ हा माझा एक नात्याने भाच्चा-पुतण्या आहे पण वृत्तीने जिवलग मित्र आहे) कुलकर्णीबाईंचा नवर्‍यावर नसेल पण भाच्यावर मात्र २००%विश्वास, अर्थात हा माझ्यापेक्षा फार काही लहान नाहीये वयाने. फार फार ८-९ वर्षे ;) ).
पण जर्कीन घालून जाणार असशील आणि फार भिजणार नसशील तर जा. माझ्या जिवाला अजून घोर नको लावू.

मी टुण्णकन उडी मारली. तिच्याकडून फोन घेतला...

"श्रीमंत, लौकर या, वाट पाहतोय."

तरीही चिंचवडवरून कात्रजला आमच्या घरी पोहोचेपर्यंत श्रीमंतांना साडे दहा वाजले आणि आल्यावर मग नाष्टा करुन निघेपर्यंत अकरा-सव्वा अकरा झाले होते. बाईकला किक मारली आणि सुसाट निघालो. सिंहगडाला उजव्या बाजूने अर्ध प्रदक्षिणा घालत पाबे घाटात प्रवेश केला..

प्रचि १ : पाबे घाटात प्रवेश करताना...

पाबे घाटात प्रवेश केला आणि इतका वेळ टॉपवर असलेली बाईक आपोआप पहिल्या-दुसर्‍या गिअरशी सलगी सांगायला लागली. वेग आपोआपच कमी झाला. तो यापुढे कायम कमीच राहणार होता. घाटातली अवघड वळणे आणि सुरक्षा हे एकमेव कारण नव्हते. किंबहुना ते खरे कारण नव्हतेच. खरे कारण होते आजुबाजूला पसरलेला, नजर जाईल तिथपर्यंत नजरेला सुखावणारा हिरवागार निसर्ग, ती मनोहर हिरवाई....

इथे वाढला वसंत,
दंवे ओलावली माती सुखकर
थांब ऐकु दे समीरा
गीत हिरवाईचे निवांत क्षणभर
थांब जरा बोल हळु
ऐक डुलत्या पालवीचे शब्दसुर
बघ निशःब्द रानवेली
अलवार करीती नाजुक कुरकुर

प्रचि २

आमचा पहिलाच थांबा होता एक विस्तीर्ण जलाशय. इथे थोडावेळ थांबून पुढे सरकलो. उशीरा निघालेलो असल्यामुळे कुठेच फार काळ थांबता येत नव्हते. दुपारी तीनच्या आत कुठल्याही परिस्थितीत मढेघाट गाठायचा होता.

प्रचि ३

प्रचि ४

फारसे कुठे न थांबता, तरीसुद्धा बाईकचा वेग कमी असल्याने निसर्गाची हिरवी जादू अनूभवत हा हा म्हणता केळदच्या परिसरात येवून पोचलो.

ओज कसे वृक्षगर्भी
ओल्या पानांची किंचीत थरथर
झाडांमधुनी नागमोडी
वाट जशी कुणी नार अटकर

प्रचि ५

केळद गावापासून उजव्या बाजूला एक रस्ता जातो तो थेट उपांड्या घाटाकडे. तिथे घाटाच्या सुरुवातीला एका वाहत्या नदीपात्राजवळ बरीचशी मोकळी जागा आहे. गाड्या शक्यतो इथेच पार्क कराव्या लागतात. (थेट मढेघाटापर्यंत गाड्या नेवून तिथल्या वातावरणाला प्रदुषणाची ओळख करून देणारे काही नतद्रष्ट महाभाग सुद्धा असतातच). पण आम्ही गाडी इथेच पार्क केली आणि शेवटचा दिड - दोन किलोमीटरचा पट्टा पायीच निघालो. उपांड्याने अगदी झोकात आमचे स्वागत केले.

प्रचि ६

या रस्त्याने पुढे पायी चालत जाताना सहज आजुबाजूला लक्ष गेले आणि सभोवार पसरलेल्या हिरव्यागार धरित्रीने मन मोहून टाकले.

हे रान हिरवे लाजले
कोवळी जणु नववधु नवथर
इथे ओलावला वसंत
पालवी गाते हिरवाई निरंतर
सभोवार सौंदर्य फाकले
क्षणात मिटले स्वर्गाचे अंतर

प्रचि ७

पावसाची रिमझिम सुरू झालेली होती. आम्ही रमत गमत मढेघाटापाशी येवून पोहोचलो.

असे म्हणतात की कोंडाणा घेतला पण त्या लढाईत महाराजांचा सिंह गेला. त्यानंतर त्या नरसिंहाचे, नरवीर तानाजी मालुसरे यांचे शव (मढे) मावळ्यांनी आपल्या खांद्यावर वाहून त्यांच्या गावी उमरठला नेले. तिथे जाताना थकलेल्या त्या वीरांनी काही काळासाठी सुभेदारांचे शव एका ठिकाणी विश्रांतीसाठी म्हणून काही काळ टेकवले होते. आता त्या जागी कुणा अनाम भक्ताने एक छोटीशी सिमेंटची देवडी / छत्री बांधलेली आहे. (दुर्दैवाने या देवडीचा वापर सद्ध्या काही मक्याची कणसे विकणारी माणसे आपली शेगडी पेटवून मके भाजण्यासाठी करतात)
तोच हा मढेघाट आणि हेच ते पावन स्थळ.

प्रचि ८

इथून निसर्गाच्या जादुला सुरूवात होते. जसजसे जवळ-जवळ जावू लागलो तसतसे उंचावरून कोसळणार्‍या जलप्रपाताचा रौद्रगंभीर नाद कानावर पडायला सुरुवात झाली होती. थोडे जवळ जावून पाहीले, पण त्याने फारसा काही अंदाज येइना. धबधबा आहे हे निश्चित झाले होते, पण त्याच्या व्याप्तीचा, आकारमानाचा काहीच अंदाज येत नव्हता.

प्रचि ९

पुढे थोडेसे वाकून पाहण्याचा प्रयत्न केला परंतू समोरची हिरवीगार दरी आणि तिच्यातून वाहणार्‍या त्या पाण्याचा बारीकसा प्रवाह सोडला तर काहीच दिसत नव्हते.

"शिट यार, इथुन तर काहीच दिसत नाहीये ! " ओंकार आणि मी ही थोडे वैतागलोच.
प्रचि १०

प्रचि ११

"इथून काही दिसणारच नाही, तिकडे, त्या बाजूला जा. तिथून धबधबा अगदी स्पष्ट दिसतो."
समोरच्या बाजुला उभ्या असलेल्या एका बेलाग कड्याकडे बोट दाखवीत शेजारीच उभ्या असलेल्या एक काकू म्हणाल्या आणि आम्ही त्या कड्याकडे जाण्याचा रस्ता, पाऊलवाट शोधायला लागलो.

प्रचि १२

रस्ता शोधत त्या कड्यावर जावून पोहोचलो खरे, पण समोर जे अदभूत उभं होतं ते पाहून आपण इथे धबधब्याचे दर्शन घ्यायला आलो आहोत हेच मुळात विसरून गेलो. खाली खोल हिरव्यागार दरीत वाहत असलेल्या कुठल्याश्या त्या चिमुकल्या नदीने जणुकाही त्या तिथे एका चंद्रकोरीचे रुप धारण केलेले होते.

प्रचि १३

प्रचि १४

पाऊस कधी रिमझिम तर कधी जोरात कोसळत होताच, पण इथे समोरची दरी धुक्याने भरलेली, की भारलेली (?) होती. त्या धुक्यातुन दिसणारे निसर्गदेवतेच्या मंदीराचे ते हिरवेगार कळस वेड लावत होते.

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

तेवढ्यात आधी ओंकारलाच भान आले आणि तो जवळ-जवळ ओरडलाच...

"विशू, इकडे बघ...."
मी वळून बघीतले आणि... 'याचसाठी केला होता अट्टाहास' अशी काहीशी मनाची अवस्था झाली. तो देखणा, रांगडा निसर्गपुरुष खळाळत खालच्या दरीच्या दिशेने झेपावत होता. 'देता किती घेशील दो कराने' अशी अवस्था झालेली होती मनाची. अनिमिष नेत्रांनी ते सुख उपभोगणे एवढेच त्या क्षणी मनाने ठरवले होते.

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

आणि तेवढ्यात पावसाने झड धरली. इतक्या वेळ रिमझिमत एखाद्या शांत सतारीसारखा गुणगुणणारा तो पाऊस, अचानक एखाद्या तबलानवाझाने शांतपणे केरवा वाजवता, वाजवता अचानक त्रितालात शिरावे तसा बेभानपणे कोसळायला लागला. पाचेक मिनीटेच पडला असेल पण सगळीकडे वातावरण गारेगार करून गेला. अशा वेळी वंदनाताईंच्या ओळी आठवल्या नसत्या तरच नवल.

काळ्याकाळ्या मेघांमधुनी
शुभ्र कशा या धारा झरती
अवतीभवती झुलू लागल्या जलधारांच्या माळा

पाऊस कमी झाला, पण त्याची जागा आता धुक्याने घ्यायला सुरूवात केली होती. माझा हा भाच्चा कम मित्र मायबोलीचा मुक वाचक आहे. अर्थात तो माबोवर येतो ते आपल्या जिप्सीची म्हणजे योगेशची प्रकाशचित्रे बघायला. जिप्स्याच्या कुठल्यातरी अशाच एका धाग्यावर बघीतलेल्या सप्तरंगी छत्रीने ओंकारच्या मनात फार पूर्वीच घर केलेले होते, साहजिकच आज त्याने इथे जिप्सीची स्टाईल मारायचा मोह आवरण्याचा मुर्खपणा केला नाही.

प्रचि २२

तो छत्रीचे फोटो काढत असताना मी जरा स्थिरावलो होतो, तिथल्याच एका शिळेवर स्वस्थ बसलो होतो. त्यावेळी ओंकारने घेतलेला अस्मादिकांचा हा एक फोटो. (प्रचि २२ आणि २३ आणि २६ हे ओंकारने टिपलेले आहेत , खाली माझ्या नावाचा वॉटरमार्क असला तरी)

प्रचि २३

आता धुक्याचं साम्राज्य पसरायला सुरूवात झालेली होती. धुक्याची दाट चादर हळुहळु आसमंतात पसरायला लागली होती.

प्रचि २४

धुक्याचा असर काय होता हे लक्षात व्हावे म्हणून हे दोन फोटो पाहा. प्रचि २५ (आधी) आणि प्रचि २६ धुक्याच्या चादरीतला फोटो, छायाचित्रे वेगवेगळ्या दिशेने घेतलेली असली तरी दोन्ही चित्रातले झाड एकच आहे,

प्रचि २५

प्रचि २६

येताना स्वच्छ, तांबुस रंगाचा असलेला हा रस्ता, पाऊलवाट आता नुकत्याच बरसून गेलेल्या वरुणराजाच्या खुणा अंगाखांद्यावर वागवत छान सुस्तावून पडली होती. त्या चिखलातून वाट काढत आम्ही पुन्हा एकदा बाईककडे परतलो आणि बाईक घेवून परतीच्या प्रवासाला लागलो

प्रचि २७

प्रचि २८
ओंकार पंचवाघ, ज्याच्यामुळे ही देखणी सहल घडली. धन्यवाद ओंकार !

पुन्हा तोच हिरव्यागार वनराईतून, भाताच्या खाचरातून जाणारा रस्ता, तेच मनमोहक वातावरण...

प्रचि २९

केळद घाट उतरल्यावर उजवीकडे दिसणारा हा अनामिक पर्वतराज जणू काही "पुन्हा या रे बाळांनो" असे म्हणत निरोपच देत होता.

प्रचि ३०

येताना पुन्हा एकदा सकाळी लागलेल्या जलाशयापाशी थांबलो. आता भास्करराव सुद्धा परतीच्या प्रवासाला लागले होते. त्यांचे दर्शन काही झाले नाही. पण कातरवेळेच्या त्या संध्याछाया त्यांच्या अस्तित्वाची ग्वाही देत होत्या.

प्रचि ३१

त्या मावळत्या सुर्यनारायणाला मनोमन नमस्कार करून, पुढच्या पावसाळ्यात मढेघाटाला पुन्हा एकदा आणि शक्य झाले तर मुक्कामी भेट द्यायची असा निश्चय करून आम्ही घराकडे परत निघालो.

विशाल...


http://www.misalpav.com/node/29937



नेसरी स्मारक / सामानगड / रांगणा नाईट ट्रेक

 क्रिसमसच्या दिवशी मुंबई ते उरण साई मंदिर हे ३५ किमी पदयात्रा करताना पायाच्या तळव्याला दुखापत झाली होती त्यामुळे या ट्रेकला कितपत चालता येईल याची शंका होती. तसाच दुखरा पाय घेऊन २५ डिसेंबरला मुंबईहून आम्ही निघालेलो २६ डिसेंबर ला सकाळी गडहिंग्लज येथील महागाव येथे उतरलो. शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवलेला एक तिशीचा मुलगा आमची सगळी व्यवस्था पाहत होता. अंगाने काटक, हसरा चेहरा, प्रसन्न व्यक्तिमत्व यामुळे त्यांच्याशी ओळख होऊन गप्पा देखील सुरु झाल्या. संतोष हासुरकर त्याचे नाव. संतोष दुर्गवीर संस्थेतर्फे गडांच्या संवर्धनाचे काम करतात. आम्ही त्यांच्याच सासुरवाडीत उतरलो होतो. संस्थेच्या साईट वर ट्रेकची माहिती वाचून संतोषने त्याच्या सासुरवाडीत उतरण्यास भाग पाडले आणि आदल्या दिवशी स्वतः येऊन आमची व्यवस्था पाहत होता. तिथेच फ्रेश झालो, नाश्ता केला. नंतर सुरु झाली ओळख परेड, त्यात दुर्गवीर संस्थेबाबत अधिक माहिती कळाली. त्यांच सामानगडावर संवर्धनाच काम चालू आहे.

https://lh3.googleusercontent.com/-6VreaByATUo/Vtg7i2roivI/AAAAAAAASXM/pdnk6_hKKOs/s640-Ic42/12523162_1182791498401051_6598958598870677824_n.jpg
संतोष दुर्गावीर बद्दल माहिती देताना

https://lh3.googleusercontent.com/-RFXJuLMOAQ4/Vtg7js3QxII/AAAAAAAASXM/B7G_fBqKd3Q/s640-Ic42/12540601_1182791495067718_3417702144630549175_n.jpg
संतोष आणि कुटुंबीय डाव्या बाजूला

पहिला टप्पा होता नेसरी खिंडीतील प्रतापराव गुजरांच स्मारक. आपल्या स्वराज्याचे तिसरे सरनोबत प्रतापराव गुजर. कुडतोजी गुजरांना मिर्झा जयसिंघा सोबतच्या लढाईत गाजवलेल्या अतुल्य पराक्रमाबद्दल शिवाजी महाराजांनी "प्रतापराव" ही पदवी बहाल केली.

नाश्ता करून चार वडाप मध्ये बसून नेसरी स्मारक पाहण्यास निघालो.

https://lh3.googleusercontent.com/-5TUEvmzc3zA/VoImXXgrovI/AAAAAAAARQs/e_vajydD4rs/s640-Ic42/IMG_5173.JPG
नेसरी स्मारकाच्या वाटेवर

नेसरी चौकातच प्रतापराव गुजरांचा घोड्यावरील युद्धाच्या आवेशातील देखणा पुतळा आहे.

https://lh3.googleusercontent.com/-JJUZmAoqxFI/Vtg7hTbVDJI/AAAAAAAASXM/C9CfB480RVI/s640-Ic42/12509127_1182792175067650_1316872391957162155_n.jpg

नेसरी स्मारकात प्रवेश करताना अंगावर त्या शुरवीरांचा पराक्रम आठवून काटा आला. आतमध्ये डाव्या बाजूस शिवाजी महाराजांचा १८/२० फुट उंच सिंहासनारूढ पुतळा आहे. महाराजांसमोर नतमस्तक होऊन मधोमध असणारा स्तंभ पाहायला गेलो. त्यावर त्या युद्धाची माहिती लिहून ठेवली आहे. आणि स्तंभासमोर शुरतेचे प्रतिक म्हणून एक ढाल आणि तलवार आहे. आता वेळ होती स्मारकातील महत्वाची वास्तू पाहायची. त्या सात शूरांच्या शुरतेचे प्रतिक म्हणून उभारलेले एक देखणे शिल्प. खाली सहा ढाली त्यावर खांबासारख्या सात तलवारी आणि त्या तलवारींवर एक ढाल. शार्दुलने नेहमीप्रमाणे ध्येयमंत्र, प्रेरणा मंत्र म्हटला.
तिथेच राखणदारी साठी असलेले काका सांगत होते की अजूनही त्या ओढ्याच्या पाण्याचा रंग त्या दिवशी लाल होतो. जणू काही त्या शूरांचा रक्त त्यात मिसळले असावे.

https://lh3.googleusercontent.com/-Lv3nOpWHhIA/Vtg7hdLUY8I/AAAAAAAASXM/xMDsM7r4Bis/s640-Ic42/12509078_1182792188400982_712457137084918640_n.jpg
नेसरी स्मारक

https://lh3.googleusercontent.com/-78pTxo-rRFM/VoImi2LP4YI/AAAAAAAARQs/BUZY5AJVEXk/s512-Ic42/IMG_5179.JPG

https://lh3.googleusercontent.com/-jkKqDGjbX6Q/VoImktSj6zI/AAAAAAAARQs/KbZlcyNyww0/s512-Ic42/IMG_5180.JPG

https://lh3.googleusercontent.com/-nevRHOWShSU/VoIm6NEdTWI/AAAAAAAARQs/mcbZzqzB5GA/s512-Ic42/IMG_5188.JPG
शिव-मंदिर

https://lh3.googleusercontent.com/-QaQc0zB2otw/VoIm8E6fo6I/AAAAAAAARQs/9AKQHQ43vPs/s512-Ic42/IMG_5189.JPG
७ वीरांच्या शुरतेचे प्रतिक म्हणून उभारलेले शिल्प - ७ ढाली आणि ७ तलवारी

https://lh3.googleusercontent.com/-ZdhgfASr8KQ/Vtg7h8ByocI/AAAAAAAASXM/KzBI4hdOKbI/s512-Ic42/12509209_1182792395067628_5682716024109368458_n.jpg

https://lh3.googleusercontent.com/-6HIJVo_eJGI/VoInELbyVCI/AAAAAAAARQs/tKt5D_tur5g/s512-Ic42/IMG_5195.JPG

त्या समाधीला वंदन करून सामानगडाकडे निघालो. सामानगडाचा आवाका बराच मोठा आहे. सामान गडाच वैशिट्य म्हणजे जमिनीतील गुहेत असलेल्या कैद्यांना ठेवायच्या कोठड्या आणि सात कमानी असलेली विहीर. विशाळगड, पन्हाळा, भुदरगड, रांगणा या किल्ल्यांच्या मधोमध सामानगड असल्याने रसद पुरवण्याच्या दृष्टीने एकदम चांगला असा हा किल्ला. त्यामुळेच याच महत्व अनन्य साधारण. यावर रसद, दारुगोळा वगैरे ठेवत असत त्यामुळे या गडाला सामानगड हे नाव पडले असावे.

कोल्हापूर जिल्हयातील इतर गडांप्रमाणेच सामान गड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते. सन १६६७ मध्ये शिवरायांनी हा गड जिंकून घेतला. या किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुख सुरनिस अण्णाजी दत्तो यांचेकडे होती. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सामानगडाच्या पुनर्बांधणीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. या भागाची सबनीसी त्यांच्याकडे होती. सन १६८८ मध्ये सामान गड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१ पूर्वी हा गड पुन्हा मराठयांकडे आला. शहजादा बेदारबख्त याने किल्ल्यास वेढा घालून तो जिंकला व शहामीर यास किल्लेदार नेमले. सन १७०४ मध्ये मराठयांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. या नंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. १८४४ मध्ये सामान गडाने इंग्रजाविरुध्द प्रथम बंडाचे निशाण फडकवले. बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतरांनी केले. त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली. या बंडात ३५० गडकरी, १० तोफा, १०० बंदूकबारदार व २०० सैनिक होते. या शिंबदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले, परंतु शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ रोजी सामानगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली.

https://lh3.googleusercontent.com/-DdRGBz4dH1c/VoInqEH5U0I/AAAAAAAARQs/hjSI8Z94RCM/s640-Ic42/IMG_5214.JPG

https://lh3.googleusercontent.com/-7uVP-QX5cPo/Vtg7e6G-vpI/AAAAAAAASXU/wPVQhJrB9Is/s640-Ic42/12376184_1182792768400924_7730769702353569879_n.jpg
सामानागडाचे प्रवेशद्वार

https://lh3.googleusercontent.com/-ai1r4K2PhWU/VoIn7wvqzaI/AAAAAAAARQs/M4M0ZebBEKM/s640-Ic42/IMG_5221.JPG

https://lh3.googleusercontent.com/-VCiYcG_hqCE/VoIoIOjKydI/AAAAAAAARQs/vNYRnA0vOhc/s640-Ic42/IMG_5224.JPG

https://lh3.googleusercontent.com/-CIzPpcDehzw/VoIoJLyH3EI/AAAAAAAARQs/OBdJoIfYjnA/s640-Ic42/IMG_5225.JPG
एका बांधीव चौकोनात आत खोदलेली विहीर

https://lh3.googleusercontent.com/-ePQRUc58DzI/VoIoOo9LJNI/AAAAAAAARQs/lqzvJt6DLdo/s640-Ic42/IMG_5226.JPG
चौकोनात उतरण्यासाठी पायऱ्या

https://lh3.googleusercontent.com/-_Ipe0rfmURU/VoIo3omzktI/AAAAAAAARQs/ZfNL_nYR8Zo/s512-Ic42/IMG_5243.JPG
सात कमानी असलेली विहीर

https://lh3.googleusercontent.com/-b7x0NV-2bzA/VoIo-nAj2SI/AAAAAAAARQs/5LI35IZFZE0/s512-Ic42/IMG_5245.JPG

https://lh3.googleusercontent.com/-_FR03ygASgI/VoIpDxRyuBI/AAAAAAAARQs/0pkeW6FDVjQ/s640-Ic42/IMG_5248.JPG
दुर्गवीर प्रतिष्ठान

https://lh3.googleusercontent.com/-5LKC9j1eQx0/VoIpEZlw_0I/AAAAAAAARQs/JZh4gEjwMBc/s512-Ic42/IMG_5249.JPG
मंदिरातील अंबाबाईची मूर्ती

https://lh3.googleusercontent.com/-eTJ3qN6D8Js/VoIpQpW-cMI/AAAAAAAARQs/9mFE0P56Svs/s512-Ic42/IMG_5254.JPG
अंधार कोठडी - अंधार कोठडीत अपुऱ्या उजेडामुळे नीट फोटो काढता आले नाहीत

तिथे एक मुलगा बाईक वरून आला होता, अंगात पिवळ्या टी शर्ट वर दुर्ग संस्कार छापलेलं होत. त्याने देखील शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवली होती. त्याच नाव विसरलो. त्याच्याशी बोलायला लागल्यावर कळल की तो दर शनिवारी पाच गडावरील पाणी घेऊन जाऊन शिवा काशीद यांच्या समाधी धुवायचा, म्हणजे एक प्रकारे अभिषेक करायचा. त्याच्या या कामाबद्दल विचारलं तर तो म्हणाला "शिवा काशीद यांच्या कार्याची आठवण म्हणून करतोय. जेणेकरून त्या शूराच
विस्मरण होऊ नये. मी माझ्या तालुक्यातले, माझ्या जवळपास च्या किल्ल्यांची काळजी पहिली घेईन मग बाहेरच्या किल्ल्याचं बघेन. सुरुवात माझ्या घरापासून करेन मग बाहेर जाईन."

सामान गडावर जागोजागी साफसफाईचे दुर्गवीरचे काम चालू होते. दर रविवारी त्यांचा हा कार्यक्रम चालू होता.

तिथे असलेल्या मंदिरात जरा निवांत बसलो. त्या गरम वातावरणात थंडगार लादीवर बसून जीव शांत झाला. ट्रेकच्या पुढल्या टप्प्याबद्दल सर्वांना सांगितलं. तिथून निघून जवळच असलेल्या हनुमान मंदिराला भेट द्यायला निघालो.

https://lh3.googleusercontent.com/-LhKgzRVRBAE/Vtg7isCxvPI/AAAAAAAASXM/vHK-BMGz6-Y/s640-Ic42/12510381_1182794071734127_447983167109135478_n.jpg

https://lh3.googleusercontent.com/-6uA9Vb2FBjU/VoIp4wniKiI/AAAAAAAARQs/vn8c8l5fq_8/s512-Ic42/IMG_5269.JPG

https://lh3.googleusercontent.com/-id78B3xz-hg/VoIp5Cy8HGI/AAAAAAAARQs/jwdvGH-MrCY/s640-Ic42/IMG_5270.JPG

https://lh3.googleusercontent.com/-ekZTc1kCoN0/VoIqBn1gPOI/AAAAAAAARQs/IZ4TNzD_53w/s512-Ic42/IMG_5272.JPG

https://lh3.googleusercontent.com/-a_g_lQAoHds/VoIqINX6-8I/AAAAAAAARQs/0i6UMNiGCco/s512-Ic42/IMG_5275.JPG
मारुतीराया

रामदास स्वामी आजारी असताना, त्यांना शिवाजी महाराजांची परीक्षा घेण्याची इच्छा झाली. त्यांच्या आजारावर फक्त वाघीणीच दुधाने फरक पडेल अस सांगून शिवाजी महाराजांना ते आणण्यास सांगितले अशी आख्यायिका आहे. शिवाजी महाराजांनी ज्या गुहेतून वाघीणीच दुध काढून आणले ती गुहा या हनुमान मंदिरापासून १० मिनिटावर आहे अस कळल्यावर ती गुहा पाहायला गेलो. अजूनही तिथे वाघाची डरकाळी ऐकू येते अस गावकऱ्यांकडून कळाल. आम्ही देखील वाघाच्या पायाचे ठसे दिसताहेत का हे बघत होतो पण काहीच आढळून आले नाही.

https://lh3.googleusercontent.com/-JLc3uTE1aKw/VoIqJvNJ25I/AAAAAAAARQs/8ncTsH-6Zus/s512-Ic42/IMG_5276.JPG
गुहा

https://lh3.googleusercontent.com/-wArLh9BOTwA/VoIqPnbAA4I/AAAAAAAARQs/BQFi_nIs5qk/s512-Ic42/IMG_5278.JPG

https://lh3.googleusercontent.com/-rKz1gVsFLzQ/VoIqOmb6n0I/AAAAAAAARQs/GVztbz0JM38/s640-Ic42/IMG_5279.JPG

तिथे जवळच प्रभू रामचंद्रांनी वनवासात असताना वास्तव्य केलेला वाडा आहे.

https://lh3.googleusercontent.com/-YfiPJtjHWQs/VoIqa251WYI/AAAAAAAARQs/v_qefV2GR2Y/s640-Ic42/IMG_5286.JPG

https://lh3.googleusercontent.com/-xo1SVk0lv18/VoIqfYepU2I/AAAAAAAARQs/rj8GlCmF-68/s512-Ic42/IMG_5289.JPG

तिथून निघून उत्तूरच्या मार्गी लागलो. उत्तुरला खानावळीत जेवून पाटगाव ला निघालो. रांगण्यावर जाण्याआधी एक छोटस सरप्राईज असल्याच मंदिरात शार्दुलने सांगितलं होत. नकाशाप्रमाणे रांगण्याच्या पायथ्याच गाव म्हणजे भटवाडी मग आपण पाटगावला का चाललोय याचा अर्थ लागेना. विचारल्यावर शार्दुलने तेच सरप्राईज असल्याच सांगितलं.

https://lh3.googleusercontent.com/-v1fLw2uyySQ/VoIqjAyXGsI/AAAAAAAARQs/oHDkA6dh84c/s640-Ic42/IMG_5292.JPG
सामानगडावरून निघताना

गाडी एका प्रशस्त लाकडी वाड्याबाहेर थांबली. तो वाडा म्हणजे मौनी महाराजांची समाधी.
https://lh3.googleusercontent.com/-7fzefPR22gc/VoIqjx5mpAI/AAAAAAAARQs/nLBMGc5RQ0M/s512-Ic42/IMG_5293.JPG
वाड्याच प्रवेशद्वार

शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी निघाल्यावर मौनी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आले होते. हेच या जागेचे ऐतिहासिक महत्व. मौनी महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन वाडा फिरायला बाहेर पडलो. आता अंधार पडू लागला होता आणि आम्हाला लवकर भटवाडीत पोहोचायचं होत त्याकरिता शार्दुल सर्वांना हाकलवत होता.

https://lh3.googleusercontent.com/-DrpyqM6g5bE/Vtg7kGQgt_I/AAAAAAAASXM/Xh759YHHIes/s640-Ic42/1422459_1182796125067255_4546920343444295711_n.jpg
वाडा १

https://lh3.googleusercontent.com/-44x9gMDn3cA/Vtg7lbdlAiI/AAAAAAAASXM/TyTypJqKn4g/s640-Ic42/3928_1182796008400600_5891972654227207801_n.jpg
वाडा २

https://lh3.googleusercontent.com/-bzf4jNse_yU/Vtg7j7YTY0I/AAAAAAAASXM/aAALNuLl8Ik/s640-Ic42/12549041_1182796105067257_8649962178192037779_n.jpg
वाडा ३

https://lh3.googleusercontent.com/-LEMVWwc_iE0/VoIqsYuiBFI/AAAAAAAARQs/husMzdJ18DA/s640-Ic42/IMG_5298.JPG
वाडा ४

https://lh3.googleusercontent.com/-TQBc7JKuKdI/VoIqtOWfYhI/AAAAAAAARQs/WaE_MDC2JoI/s640-Ic42/IMG_5299.JPG
वाडा ५

https://lh3.googleusercontent.com/-HY4XVElTjls/VoIqtUCFpTI/AAAAAAAARQs/nOywAPc0g8U/s640-Ic42/IMG_5300.JPG
खांबावरील नक्षीकाम-१

https://lh3.googleusercontent.com/-5jStTeKJ-CI/VoIqv3fwywI/AAAAAAAARQs/Z9J9VLUHttQ/s640-Ic42/IMG_5301.JPG
खांबावरील नक्षीकाम-२

https://lh3.googleusercontent.com/-rLxaTAZ2YD0/VoIqn5DV3eI/AAAAAAAARQs/-6zsdJJDcBU/s512-Ic42/IMG_5296.JPG
खांबावरील नक्षीकाम-३

https://lh3.googleusercontent.com/-4GyIwCii50U/VoIqzGe6w0I/AAAAAAAARQs/hm1GTTu2hxU/s640-Ic42/IMG_5302.JPG
खांबावरील नक्षीकाम-४

https://lh3.googleusercontent.com/-a6vyVSeOcAg/VoIq-uoQUGI/AAAAAAAARQs/gzKwiIO4QhY/s640-Ic42/IMG_5310.JPG
खांबावरील नक्षीकाम-५

https://lh3.googleusercontent.com/--mbFUa84Hfs/VoIq6pGKHxI/AAAAAAAARQs/BK56IYn4AME/s640-Ic42/IMG_5307.JPG
नरसिंह अवतार

https://lh3.googleusercontent.com/-yi_frnSyC_s/Vtg7iPyHjPI/AAAAAAAASXM/YbIuWXiT3nU/s512-Ic42/12510243_1182796055067262_4917188144021323167_n.jpg
मौनी महाराज समाधी

आता रांगण्याच्या दिशेने निघालो. रांगण्याचे मार्गक्रमण अंधारातच करायचे हे पूर्वनियोजित होते. पण ट्रेक मध्ये गडबड झाली नाही तर तो ट्रेक कसला? महाराज सुद्धा मावळ्यांची परीक्षा घेत असतात. भटवाडी हे रांगण्याच्या आधीचे गाव, जिथे डांबरी रस्ता संपतो आणि कच्चा रस्ता चालू होतो हे माहित होते. पण भटवाडी येउन गेली हे कळलीच नाही आणि डांबरी रस्ता संपला आणि आम्ही कच्च्या रस्त्याने आमच्या गाड्यांचा ताफा हाकत राहिलो. कच्चा रस्ता जंगलातून चालूच होता. ओळखीच्या खुणा दिसत नव्हत्या. शंकेची पाल चुकचुकली तरीही काही अंतर गाड्या नेल्या. मग रस्ता चुकलो याची खात्री पटली आणि पुन्हा गाड्या माघारी वळवल्या. भटवाडीत येउन थांबलो. त्यावेळी आमचे स्थानिक मित्र ज्यांनी आमच्या जेवणाची सोय रांगण्यावर केली होती ते आमची भटवाडीत वाट बघत होते. भटवाडी नंतर रांगणा किल्ल्यासाठी उजव्या बाजूला रस्ता गेलाय तो अंधारामुळे दिसला नाही आणि आम्ही एक्स्ट्रा जीप सफारी करून आलो. ज्या ठिकाणी रस्ता चुकलो होतो तिथे संस्थेतर्फे दिशादर्शक बोर्ड लावायचा ह्याचा निर्णय झाला.

https://lh3.googleusercontent.com/-z3Dj0OIEYHo/Vtg7f0F4gMI/AAAAAAAASXU/8bsG_RtMYJs/s640-Ic42/12438947_1182796705067197_596445872694946541_n.jpg

आता आम्ही आमच्या गाड्यांना टाटा केला आणि पाठीवर सामान चढवून रांगण्याच्या जंगलातून किल्ल्याच्या दिशेने निघालो. वाटाडे असल्यामुळे आता चुकण्याचा प्रश्नच नव्हता. पौर्णिमा दोनच दिवसांपूर्वी होऊन गेली असल्यामुळे मस्त चांदण्याचा उजेड होता. निशब्द शांतता, मस्त चंद्र प्रकाश, थंड वातावरण आणि सोबत हातात हात घालून चालणारी बायको, मस्त एकदम रोमांटिक माहौल. बायको एकदम खुश, मला थ्यांक्स म्हणाली या ट्रेकला आणल्याबद्दल. शेजारच्या टेकडीवर वणवा पेटला होता त्याची धग आम्हाला इतक्या दूर असताना देखील जाणवत होती.

सर्व मंदिरे आणि मोक्याच्या जागा आधीच बुक असल्यामुळे आम्ही उघड्यावर थांबायचा निर्णय घेतला. खालीच तळ्याकाठी घोटगे कणकवली येथील १० मित्रांनी गरमागरम वरण भात लोणचे जेवू घातले. प्रचंड भूक आणि कडाक्याच्या थंडीतील त्या लज्जतदार जेवणाची सर कशालाच येऊ शकत नाही. जेऊन झाल्यावर झोपण्यासाठी पथारी पसरली तर वारा चारी बाजूने उडवून देत होता. एका ठिकाणी पकडलं तर वारा दुसऱ्या बाजूने उडवून लावी. कसेबसे स्लीपिंग ब्यागेत घुसलो आणि झोपेची आराधना करू लागलो. वरती चांदण्यांनी भरलेलं आकाश, त्याचा पडलेला प्रकाश. घोंघावणारा वारा, प्रचंड थंडी यामुळे झोप लागेना.

https://lh3.googleusercontent.com/-H_Tl43v-zI0/VoIrkZccCDI/AAAAAAAARQs/JX7GeNgnKTo/s640-Ic42/IMG_5338.JPG

https://lh3.googleusercontent.com/-Vcjc9QfC99c/VoIrfKL3-KI/AAAAAAAARQs/qoJfnOg7lOg/s640-Ic42/IMG_5337.JPG

https://lh3.googleusercontent.com/-AF7cJCmCR18/VoIr34vvykI/AAAAAAAARQs/8TGbUpI4D6I/s640-Ic42/IMG_5351.JPG

https://lh3.googleusercontent.com/-XllG2bULqBc/VoIsEnyIoHI/AAAAAAAARQs/e-TLagOpjrU/s640-Ic42/IMG_5356.JPG
सकाळच्या नाश्त्याची तयारी

https://lh3.googleusercontent.com/-nAWWaoQSWus/VoIsaYykXmI/AAAAAAAARQs/e820rJLJeQo/s640-Ic42/IMG_5361.JPG

रविवारी पहाटे फटफटल्यावर एक एक जण उठत होता. आन्हिक उरकून किल्ला फिरून येत होता. दुखऱ्या पायामुळे हा गड पूर्ण पाहता आला नाही, पण बाकी सर्व सकाळी उठून पूर्ण गड फिरून आले. रांगणा किल्ल्याचे स्वराज्यातील महत्व हे की शिवराय आग्र्याच्या कैदेत असताना स्वतः जिजाऊनी मोहीम आखुन हा किल्ला आदिलशहा च्या ताब्यातून स्वराज्यात सामिल करून घेतला. गडाच्या रांगडेपणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या १३ किल्ल्यांमध्ये रांगणा किल्ल्याचा प्रथम क्रमांक लागतो.

https://lh3.googleusercontent.com/-_MnOreLVUhc/Vtg7d_JI1sI/AAAAAAAASXU/60K7JQAXQuE/s640-Ic42/12008_1182799338400267_3750448022987729583_n.jpg
दीपमाळ आणि मागे दिसणारे रांगणाई देवीचं मंदिर

https://lh3.googleusercontent.com/-dz_qU7zgq8M/VoItSr1F9CI/AAAAAAAARQs/Idt37qyOoIE/s640-Ic42/IMG_5386.JPG

https://lh3.googleusercontent.com/-rtUog30p7Pk/Vtg7lSUWKbI/AAAAAAAASXM/wBxtzFMIZ-E/s640-Ic42/944948_1182798755066992_1405739560138652429_n.jpg

https://lh3.googleusercontent.com/-ob5IHxxdO0I/Vtg7hzZqPsI/AAAAAAAASXM/LlGlSDZSIzo/s640-Ic42/12509567_1182804588399742_6550301884975598807_n.jpg

https://lh3.googleusercontent.com/-RrGDRCi5qAw/VoIsdc1EsjI/AAAAAAAARQs/lnpIuZcYuHY/s640-Ic42/IMG_5362.JPG

https://lh3.googleusercontent.com/-MBo2R5FbzFM/VoIsw6WjIhI/AAAAAAAARQs/2zsORZN1GHI/s640-Ic42/IMG_5370.JPG

https://lh3.googleusercontent.com/-BidjxV40vrc/Vtg7e9d7XrI/AAAAAAAASXU/6dFczV8z98w/s640-Ic42/12400606_1182799808400220_8892907226411107501_n.jpg

https://lh3.googleusercontent.com/-GJvXVhWuN3k/Vtg7fKNy5yI/AAAAAAAASXU/2QsIo2J46O0/s640-Ic42/12400618_1182800611733473_7101365514109603308_n.jpg

सर्वांनी चहा नाश्ता घेऊन ९.३० वाजता गड सोडला. तिथल्याच चिकेवाडीत या ४-५ घरांच्या वाडीत आम्ही शिवशौर्य तर्फे काही कपडे आणि लहान मुलांसाठी खेळणी भेट दिली

https://lh3.googleusercontent.com/-eta7cixsfPc/Vtg7gPn1I-I/AAAAAAAASXM/-wBFGVYckIE/s640-Ic42/12507377_1182809558399245_7536604231484998469_n.jpg

कालच्याच मार्गाने trek करत भटवाडीच्या पुढील आडे गावात आलो. जंगला नंतर डांबरी रस्त्याने चालून सर्वचजण कंटाळले. वाटेत दोन ठिकाणी आपुलकीने चहा झाला. आडेगावातून आम्ही डावे वळण घेत सरळ उतरणीला लागलो. दुपारचे १ वाजले आहेत हे जराही जाणवत नव्हते इतक्या घनदाट मोठ्या वृक्षांच्या गर्दीत आम्ही घाटावरून कोकणात उतरत होतो. डांबरी रस्त्यावर आलेला कंटाळा कुठच्या कुठे पळाला.

https://lh3.googleusercontent.com/-h0oQ5v5czJ0/Vtg7g3XFfFI/AAAAAAAASXM/oF_2-liuzB8/s640-Ic42/12508894_1182811571732377_3637770005819568994_n.jpg

https://lh3.googleusercontent.com/-ds1O9QD1uaE/Vtg7jeWQHsI/AAAAAAAASXM/wYhdLXKt0k0/s640-Ic42/12523195_1182809568399244_6263512256698527249_n.jpg

https://lh3.googleusercontent.com/-i7kgfpbTLd0/VoItwKXKpOI/AAAAAAAARQs/up5iXHkuoak/s512-Ic42/IMG_5396.JPG
अस्मादिक

https://lh3.googleusercontent.com/-HzSIlrvOF64/VoItxTz0qvI/AAAAAAAARQs/1ZgIOMNIqVw/s640-Ic42/IMG_5397.JPG
ओळख पाहू काय आहे

https://lh3.googleusercontent.com/-m_ERqWV0rWE/VoItywj0AZI/AAAAAAAARQs/5g5rFrPdqKM/s640-Ic42/IMG_5398.JPG

https://lh3.googleusercontent.com/-mXwtbO34sXI/Vtg7ingZziI/AAAAAAAASXM/BPJIhnE4a7U/s640-Ic42/12523067_1182811498399051_7553922143160944148_n.jpg
कोकणात उतरताना

साधारण तासाभराने आम्ही कोकणातील घोटगे गावात पोहोचलो. हे आमच्या नितीन पन्हाळकरचे गाव. गेल्या गेल्या घरच्या अंगणातच थंडगार पाण्याने आंघोळ केली सर्वांनी. मालवणी भाषेतच आमची प्रेमाने विचारपूस होत होती. मालवणी जेवण आणि सोलकढी.... यथेच्च ताव मारला. किमान एका एका व्यक्तीने चार-पाच कप सोलकढी रिचवली.

https://lh3.googleusercontent.com/-lAXQSiJ9rH8/Vtg7k23hfbI/AAAAAAAASXM/qS3YLzV1GtY/s640-Ic42/261955_1182812371732297_8270650853644287820_n.jpg

https://lh3.googleusercontent.com/-BM7J-aAakrc/Vtg7fo7EaUI/AAAAAAAASXU/y5fs7WEYa7E/s640-Ic42/12417710_1182813658398835_4953294068040141354_n.jpg
जय भवानी प्रासादिक मंडळ

एवढ्या दुर्गम भागात कडाक्याची थंडीत जय भवानी प्रासादिक मंडळाच्या आमच्या मित्रांनी आम्हाला रांगण्यापासून घोट्गे गावापर्यंत मोलाची मदत केली,रुचकर जेवण दिले. त्यासाठी त्यांचे श्रीफळ देऊन आभार मानले. जड अंतकरणाने निरोप घेतला जातो आम्ही तर जड शरीरानेच (जेवणावर आडवा हात मारल्यामुळे) निरोप घेतला. घाटमाथ्यावरून कोकणात उतरणाऱ्या ट्रेकची यशस्वी सांगता झाली.

सामानगड - गडहिंग्लजवरुन भडगाव चिंचेवाडी मार्गे आपण गडाच्या पठारावर पायउतार व्हायचे. चिंचेवाडी गावातील भल्यामोठया विहिरीच्या बाजूला असलेल्या २ फिरंगी तोफा गावाच्या ऐतिहासिकतेची साक्ष देतात. डाव्या हाताची डांबरी सडक गडावर जाते. तर उजव्या हाताची सडक मारुती मंदिराकडे जाते.डाव्या बाजूच्या सडकेने गडावर प्रवेश करायचा. गडावर राहण्याची, जेवणाची सोय नाही. विहिरीतील अथवा तलावातील पाणी पिण्यायोग्य नाही.

रांगणा - कोल्हापूरहून गारगोटी - कडगाव मार्गे पारगाव गाठायचे. पाटगाव पासून तांब्याचीवाडी मार्गे भटवाडी गाठायची. पाटगाव ते भटवाडी १० - १२ किमीचे अंतर असावे. भटवाडी पासून पुढे ४५ किमी वर चिक्केवाडी आहे. मोठी गाडी तांब्याच्या वाडी पर्यंत जाते, पण छोटी गाडी असेल तर ती चिक्केवाडी पर्यंत जाऊ शकते. अन्यथा तांब्याची वाडी ते चिकेवाडी अंतर पायीच कापावे लागते.
भटवाडीत पोहोचल्यावर गावाच्या मधून जाणार्‍या रस्त्याने आपण धरणाच्या भिंतीजवळ पोहोचतो. येथून उजव्या हाताने लाल मातीचा गाडी रस्ता सुरु होतो. या रस्त्याने आपण तळीवाडी मार्गे चिक्केवाडीला पोहोचायचे. चिक्केवाडीतून एक ठळक पायवाट रांगण्यास जाते. वाटेत एक दगडी उंबरठा व चौकीचे अवशेष दिसतात. यापुढे येणारी खिंड पार करुन उतरल्यावर आपण रांगण्यासमोरील पठारावर येतो. रांगणाई देवीचे मंदिर प्रशस्त असून, मुक्कामास योग्य आहे पण जेवणाची सोय आपण स्वत: करावी. गडावरील तलावात पिण्यायोग्य पाणी आहे.

http://www.misalpav.com/node/35178



Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...