सासवडचीये नगरी : संगमेश्वर,चांगवटेश्वर
सासवडचीये नगरी : संगमेश्वर,चांगवटेश्वर
सॉलीट्युड हौसेचे दुसरे व्हर्जन म्हणून सासवडला प्रयाण केले. सकाळी ७ ला उठलो, चहा पाणी झाल्यावर आईला शाळेत सोडायला निघालो. "जवळच पुढे कुठे तरी जाऊन येऊ " असा विचार करून एक पाण्याची बाटली आणी थोडा खाऊ पाठीवर पाठ -पिशवीत टाकले आणी निघतानाच घरी सांगितले की संध्याकाळी घरी येईन थोडा फिरून.
सासवड मधली शिवमंदिरे व लोणी भापकर येथील यज्ञवराह याबद्दल बरेच वाचले होते अंतरजालावर . सो 'सॉलीट्युड'च्या हौशी प्रमाणे ऐनवेळी ठरलेली भटकंती आणी ऐनवेळी ठरलेले ठिकाण हे समीकरण जुळून आले. कोथरूड पासून वारजे ला निघालेलो मी, पुढे सासवड, मोरगाव, जेजुरी, लोणी भापकर असा फिरत फिरत येताना त्यातही हौस म्हणून एक छोटेखानी किल्ला पण करून ९ च्या आत घरात आलो.
कात्रजला कात्रज डेअरी मध्ये जाऊन ४ पिशव्या फ्लेवर्ड मिल्क/ पिस्ता स्वादाचे दुध घेतले आणि गाडीला टांग मारून पोहोचलो बोपदेव घाटात. २ पिशव्या तेथे फस्त केल्यावर अजून उत्साहाने पुढे सरकलो. सकाळी साडे सातला निघालो घरातून ते वारजे, कात्रज कोंढवा रोड ने सासवड पर्यंत येताना १० वाजले होते.
पहिले डेस्टीनेशन होते संगमेश्वर मंदिर. भर सासवड गावात, सासवड-चौफुला फाट्यापासून ३-४ किमी अंतरावर नदीच्या संगमावर असलेले संगमेश्वर मंदिर बरेच प्रसिद्ध आहे.
आजूबाजूचा मस्त शांत परीसर. त्या शांततेत फक्त कपडे धुणाऱ्या बायकांचा कलकलाट. मंदिरात माझ्याखेरीज अजून कोणीच नव्हते. एक छोटासा पूलाने आपण मंदिराच्या समोर पोहोचतो. थोड्या पायऱ्या चढून आपण मंदिराच्या सभा मंडपात पोहोचतो.
पूर्ण मंदिर दगडातून बांधलेले असल्याने भर उन्हातही आत मस्त थंडगार वाटत होते.
पोहोचताच थेट गाभाऱ्यात जाऊन शंकराचे दर्शन घेतले. बाहेर पडून मग मंदिराची प्रदक्षिणा मारताना त्यावरची शिल्प आणी त्याचा इतिहास याचा सांगड घालण्याचा प्रयत्न सुरु झाला.
मंदिर एकाच दगडात कोरून काढले असावे असे वाटले. याचा कळस सोडला तर मुख्य मंदिराची रचना बरीच साध्यर्म असलेली वाटली. येथूनच उजवीकडे एक छोटी वाट खाली जाते तेथेही छोटी छोटी मंदिरे आहेत.
कळसावर केलेले मुर्तीकाम वा कातळकला लक्ष वेधून घेत होती.
येथे कळसावर खूप पक्षी बसले होते आणी सगळे एकत्र मिळून ओरडत होते. तो एक कलकलाट. पण हा मात्र हवाहवासा वाटणारा होता. रोज पारवे बघणाऱ्या नजरांना तेवढाच हिरवागार चेंज. असो.
हे महाशय बराच वेळ कळसावर फुटलेल्या एका झाडावर बसून टेहळणी करत होते.
एकटाच असल्याने यथेच्च फोटो काढत काढत फिरताना घड्याळाकडे लक्ष गेले आणी एकदम पुढचा लोणी भापकर पर्यंतचा बाकी असलेला प्रवास दिसू लागला.
चला आता येथून पाने घ्यायची वेळ झाली. येथून पुढे 'चांगवटेश्वर' मंदिरात जायचे होते. कसे जायचे याची खात्रीजमा झाल्यावर दम खात बसलेल्या गाडीला टांग मारली आणी निघालो.
मंदिरासमोरच्या पुलावरून काही फोटो काढले त्यातला हा खालचा. मंदिरापासून संगमावर जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत तेथे हा गणपती आहे. एरवी वरून दिसला नसता.
थोडीशी पेटपूजा करून निघालो 'चांगवटेश्वर' मंदिरात.संगमेश्वर मंदिरापासून १० मिनिटांवर चांगवटेश्वर आहे.
हे सुद्धा पूर्णतः दगडात कोरलेले मंदिर असावे. तेथील पुजारी काकांनी येथे बरीच डागडुजी केलेली आहे. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यापासून त्यांनी त्यांच्या कुल-पुजारी म्हणून मन असलेल्या या मंदिराचा इतिहास जाणून घेऊन स्व-हस्ताक्षरात एक माहिती फलक लिहिलेला आहे.
आत आजूबाजूला बरीच छोटेखानी मंदिरे आहेत. त्यांचीही थोडी पडझड झाली असली तरी मुख्य मंदिर सुरक्षित आहे.
येथील प्रत्येक खांबांवर यथेच्च शिल्पकला केलेली आहे. भुलेश्वर मंदिराप्रमाणे येथेही महाभारतातील काही युद्धाचे वा द्वंदाचे प्रसंग कोरलेले आहेत.
सभा मंडपापासून ते गाभारा आणी पूर्ण मंदिरभर कातळ कलेचे अप्रतिम दर्शन येथे घडते. मंदिराच्या उजव्या बाजूस मोठ्ठे बकुळीचे झाड आहे. दुसर्या वेळेस पावसाळ्यात तेथे गेलो तेव्हा ते झाड पूर्ण पांढऱ्या फुलांची शाल पांघरून उन खात पहुडलेले होते.
येथे फोटो काढायची परवानगी घ्यावी लागते. पुजारीकाकानी लगेच परवानगी दिली पण जाताना दानपेटीत स्वइच्छेने काहीतरी देण्याच्या बोलीवर. असो. एकंदर आजूबाजूचा स्वछ परीसर पाहून देणगी देताना काही वाटले नाही. ( नाहीतरी आम्ही देऊन देऊन किती ती देणगी देणार? पण असो फुल न फुलाची पाकळी.)
येथेही अज्जिबात गर्दी नव्हती. मी, पुजारीकाका आणी एक नुकतेच लग्न ठरलेले दोघे. माझा कॅमेरा बघून "त्याने" मला तेवढ्यातल्या तेवढ्यात "त्यांचे" सोनेरी क्षण टिपण्याच्या बिनपगारी कामास लावले.
आता जवळपास बारा वाजले होते. येथून डबा खाऊन पुढे जाणार होतो पण मला जेवण लोणी-भापकरलाच करायचा होता म्हणून मग उरलेल्या दोन पिस्ता मिल्क पाठीवरून पोटात ढकलले आणी निघालो पुढे मोरगाव …
मोरगावला पोहोचलो ते डायरेक्ट मंदिराच्या मुख्य दरवाज्यापर्यंत गाडी घेऊन. एकदोन "भक्त" मंडळी डाफरली पण "जल्दी जानेका हय रे बाबा मेरेकू."
येथे तुरळक गर्दी होती. अष्टविनायक टाईप पब्लिक आलेले होते. गणपती सोडून त्यांना बाकी सगळ्यात इंटरेस्ट होता. काही "महान" भक्तांनी रांगेत उभे असल्याचा त्रास रिफ्लेक्ट करत गणपतीला मोबाईलवर गाणी लाऊन साद घातली होती. अश्या लोकांचे पाप उदरात घेणारा धन्य तो लंबोदर ! प्रणाम !
रांगेत वैगरे उभे राहणे शक्यच नव्हते. लांबूनच नमस्कार केला आणी थोडावेळ बसून तिकडची स्पेशल अंजिरे पोटात ढकलली.
आता बारामती हायवेला लागलो. आणी सुसाट सुटलो.लोणी भापकरला वळण्याचा रस्ता चुकायला नको म्हणून MAP लावला आणी निघालो. येथून पुढे सुमारे २ वाजता पोहोचलो लोणी-भापकर.
यज्ञवराह पाहिला आणी वाटले ..... वाह ss याच साठी केला होता अट्टाहास. !!
त्याबद्दल पुढील भागात :
सासवडचीये नगरी : लोणी भापकर
सासवडचीये नगरी :मल्हारगड / सोनोरीचा किल्ला
वाचत राहा.
सासवडचीये नगरी: लोणी भापकर
आता बारामती हायवेला लागलो. आणी सुसाट सुटलो.लोणी भापकरला वळण्याचा रस्ता
चुकायला नको म्हणून MAP लावला आणी निघालो. येथून पुढे सुमारे २ वाजता
पोहोचलो लोणी-भापकर.
लोकप्रभा मध्ये आलेला अभिजित
बेल्हेकर यांचा लेख वाचूनच लोणी भापकर ला जायचे नक्की केले होते.
मोरगाव-बारामती रोड वरून एकदाचा "लोणी भापकर" फाटा दिसला आणी हुश्श केले.
सुर्य डोक्यावर आलेला आणी पोटातही डोंब उसळलेला. फाट्यापासून सुमारे १५-२०
मिनिटे गाडी हाकत गेल्यावर गावात पोहोचल्याचे सुतोवाच झाले. जरा वर्दळ दिसू
लागली आणी त्यातच एका मंदिराचा कळस अगदी दूरवरूनही लक्ष वेधून घेत होता.
तेच हे काळभैरवनाथ मंदिर.
काळभैरवनाथ मंदिर:-
गाडी मंदिराच्या बाहेर लाऊन आमचा फापट-पसारा बाहेरच ठेऊन मंदिरात जाऊन बसलो. रखरखत्या उन्हातून एकदम दगडी मंदिरात गेल्यावर कमालीचा गारवा जाणवला. मंदिरात महिला पुजारी होत्या. भैरवनाथाला महिला पुजारी कश्या असे एकक्षण वाटले पण मी त्या गणिताचा उलगडा करायला आलो नव्हतो. नमस्कार करून, गुलाल उडवून, थोडा आजूबाजूला फेरफटका मारला.
काळभैरवनाथ:
मंदिराच्या बाहेर दोन मोठ्या दगडी दिपमाळा आहेत . त्याने मंदिराचे रूप अजून खुलून दिसले. शेजारीच एक विहीर आहे. गाडी चिंचेच्या सावलीत दम खात होती म्हणून थोडा वेळ टीपी केल्यावर मंदिराच्या मागे गेलो.तेथे काही विरगळ होत्या. त्या बघून थोडे पुढे गेलो तर गावातल्या मुलांचा मस्त गोट्यांचा डाव जमला होता.
एकाला सांगितले की तू लांबून उडव यातली एक गोटी आणी मी फोटो काढतो. मला वाटले खूप वेळ जाईल आणि बरेच फोटो काढावे लागतील. पण हा बघा पहिलाच शॉट. ताडी !!!
एकाच गोटी उडवून स्ट्रायकर गोटी कोणालाही धक्का न लावता बाहेर निघून गेली. वा वा sss
भंकस झाली, गाडीही शांत झाली होती. मग निघालो मल्लिकार्जुन मंदिराकडे.
अडीच च्या सुमारास येथे पोहोचलो. पूर्ण निर्जन असे स्थान माझ्या जोडीला मंदिरातील देव आणी काही श्वान लोक्स. येथे आल्यावर मात्र "आधी पोटोबा नंतर विठोबा" म्हणत डबे उघडले.
कडकडून लागलेली भूक डबा उघडताच गोड शिरा पाहून अजून वाढली. आणले होते नव्हते ते सगळे मांडून खायला सुरवात करताच अजून २ श्वानांची कंपनी लाभली.
मल्लिकार्जुन मंदिर :
सभामंडप,
अंतराळ, गर्भगृह आणि नागर शैलीतील विटांचे शिखर अशी या उत्तराभिमुख
मंदिराची रचना. यातील सभामंडप पूर्वीच पडल्याने आपण थेट गाभाऱ्यापुढील
विस्तीर्ण अंतराळात प्रवेश करतो. पण तत्पूर्वी प्रवेशद्वारावरील रत्न, रूप
आणि स्तंभ शाखा आणि त्यातील निसर्ग रूपकांवर नजर टाकायची आणि तळातील
द्वारपालांची परवानगी घेत आत शिरायचे. - See more at:
http://www.loksatta.com/trekit-news/loni-bhapkar-temple-in-baramati-1044948/#sthash.JTREhOTl.dpuf
सभामंडप,
अंतराळ, गर्भगृह आणि नागर शैलीतील विटांचे शिखर अशी या उत्तराभिमुख
मंदिराची रचना. यातील सभामंडप पूर्वीच पडल्याने आपण थेट गाभाऱ्यापुढील
विस्तीर्ण अंतराळात प्रवेश करतो. पण तत्पूर्वी प्रवेशद्वारावरील रत्न, रूप
आणि स्तंभ शाखा आणि त्यातील निसर्ग रूपकांवर नजर टाकायची आणि तळातील
द्वारपालांची परवानगी घेत आत शिरायचे. - See more at:
http://www.loksatta.com/trekit-news/loni-bhapkar-temple-in-baramati-1044948/#sthash.JTREhOTl.dpuf
सभामंडप,
अंतराळ, गर्भगृह आणि नागर शैलीतील विटांचे शिखर अशी या उत्तराभिमुख
मंदिराची रचना. तळातील
द्वारपालांची परवानगी घेत आत शिरताच, आता सभामंडप नसला कारणाने आपण मंदिरात
प्रवेश करताच गाभाऱ्या पुढच्या जागेत येउन पोहोचतो. आता पुरेसा प्रकाश
नसूनही फक्त आजूबाजूला बघण्यात आपण गर्क होऊन जातो. प्रत्येक भारवाहक
खांबांवर केलेले मनसोक्त कोरीवकाम आणि त्यां शिल्पांचे संदर्भ समजावून घेता
घेता आपण मध्ययुगीन इतिहासात हरवून जातो.
शिवाच्या पायाशी डोक टेकवून आपण बाहेर पडतो तोच समोर दिसते विस्तीर्ण अशी पुष्करणी.
पुष्करणीत पाणी नसल्याने आपोआप समोर लक्ष गेले ते म्हणजे कोरीवकलेच्या उत्कृष्ठ आविष्काराकडे. दगडी नंदी-मंडप.
मंडपाच्या चारही बाजूने उत्कृष्ठ असे कोरीवकाम केलेले आहे. पौराणिक शिल्पे, कामशिल्पे आणी अनेक गज-शिल्पे.
या मंडपात पूर्वी यज्ञवराह विराजमान होता असे तेथे नव्याने उपस्थित झालेल्या आजोबांनी सांगितले. आजोबा न विचारता मला माहिती पुरवत होते त्यावरूनच त्यांचा उद्देश्य माझ्या लक्षात आला. थोडी श्रवण-भक्ती करून मग फोटोभक्ती चालू केली.
येथे एक मांजर होती ती सारखी माझ्या मागे मागे येउन पायात येत होती. तिच्या पेकाटात लाथ घालून हाकलून द्यावी वाटत होत. पुल म्हणतात तसे मांजर हा जगातला सर्वश्रेष्ठ उच्छाद आहे.
यज्ञवराह पाहिला आणी वाटले ..... वाह ss याच साठी केला होता अट्टाहास. !!
आधी वाचलेल्या लेखांमध्ये हे शिल्प मंदिराच्या मागे झाडीत पडलेले आहे असे
वाचले होते. पण त्या लेखांचा इफेक्ट कि काय म्हणून हे शिल्प मंदिराच्या
सुरवातीलाच मोकळ्या भागात आणून ठेवले आहे.
मी निघतोय असे वाटून आजोबा पुन्हा प्रकटले.
हे शिल्प त्या पुष्करणीच्या नंदी
मंडपात स्थानापन्न होते.त्यानंतर औरंगजेबाच्या आक्रमणात आणी युद्धात ज्या
काही मंदिरांची आणी शिल्पांची भंजने झाली त्यात याचाही नंबर लागतो.
भुलेश्वर येथील भंजलेल्या मूर्तींची आठवण झाली.
"त्या मुसलमानांनी ह्या मूर्तीचे
त्वांड फोडून फ्याकून दिलेली झाडीत. इतक्या दिवस तिथेच पडून होती. गावातील
लोकांनी आणलीये इथे काही दिवसांपूर्वी. ते उचलतय थोडी कोणाला? दोरी बांधून
आणायला लागल तर हलेना जागच. क्रेन बोलावली मंग आणी क्रेनने उचलून आणून
ठीवलाय इथे!"- इति आजोबा.
"त्या काळचे ते मुसलमान म्हणजे" अश्या हरीतात्यांच्या आवेशात जात असतानाच यज्ञ वराहाच्या देखणेपणाने मला इहलोकी आणले.अडीच फुट उंचीच्या या वराहाच्या शिल्पाचे तोंड फोडलेले आहे पण त्याच्या पाठीवरील असंख्य विष्णुमूर्ती कोरलेल्या पाहून कारागिराच्या नाजूक हाताची कल्पना येते. पाठीवर छोटय़ा-छोटय़ा तब्बल १४२ विष्णू मूर्तीची झूल चढवलेली आहे.
या
वराहाच्या पायाशी शेष कोरलेला आहे. तर चार पायांजवळ शंख, चक्र, गदा आणि
पद्म ही विष्णूची प्रतीके साकारलेली आहेत. पायांना नागदेवतेचे तोडे घातलेले
आहेत आणि मुख्य म्हणजे पाठीवर छोटय़ा-छोटय़ा तब्बल १४२ विष्णू मूर्तीची झूल
चढवलेली आहे. - See more at:
http://www.loksatta.com/trekit-news/loni-bhapkar-temple-in-baramati-1044948/#sthash.JTREhOTl.dpuf
या वराहाच्या पायाशी शेष कोरलेला आहे. तर चार पायांजवळ शंख, चक्र, गदा आणि पद्म ही विष्णूची प्रतीके साकारलेली आहेत. पायांना नागदेवतेचे तोडे घातलेले आहे.
पायाखाली दबलेली गदा आणि दोन पायांमध्ये हात जोडून असलेले मानवी मुख असलेली शेष-रुपी शिल्प , वाराहाने शेषावर मिळवलेल्या अधिपत्त्याची जाणीव करून देतो.
वराहाच्या शेपटीत पृथ्वी गुंढाळलेली आहे असे एका लेखात वाचलेले होते.
बरेच फोटोसेशन झाले. नाऊ टाईम टू गो होम !!
मी निघत असलेले बघताच सावलीत झोपलेले आजोबा पुन्हा प्रकटले आणी त्यांनी "काही" मदत करा म्हणताच माहितीचे प्रयोजन कळले. त्यांना यथाशक्ती मदत करून, तेथीलच एका मोठ्ठ्या चिंचेच्या झाडाच्या चिंचा पाडून घेतल्या भाच्चीसाठी.
आता गाडीला टांग मारून परतीच्या मार्गाला लागलो. येताना दिवे घाटातून जावे का असा विचार करता लगेच सोनोरीचा किल्ला/ मल्हारगड आठवला. वेळही हातात होता. आणी किल्लाही छोटेखानी होता.
सासवडची फ़ेमस अंजिरे येताना लक्ष वेधून घेत होती. थोडी घासाघीस करून १ किलो अंजिरे घेतली. पुढे ट्रेक करायचा आहे हा विचारच नव्हता. घरी येउपर्यंत त्यांचे पानिपत झालेच होते. असो. दिवे घाटाच्या अलीकडे एका टपरीवर सोनोरी विचारले आणि फाट्यावरून उजवीकडे गाडी वळवली.
आता एका छोट्या आणी उजाड अश्या रोडवर मी एकटाच चाललो होतो. मागे, पुढे, समोर कुठेही चीटपाखरूही दिसेना. तसचं संभ्रमित पुढे गेलो मग एक मामांना लिफ्ट दिली त्यांनी रस्ता समजावत भर गावात आणून सोडले. तेथून निघालो मल्हारगडचा बेस. त्याबद्दल पुढील भागात .
सासवडचीये नगरी: मल्हारगड/सोनोरीचा किल्ला, पानसे-वाडा
वाचत राहा.
सासवडचीये नगरी: मल्हारगड/सोनोरीचा किल्ला, पानसे-वाडा
आता गाडीला टांग मारून परतीच्या मार्गाला लागलो. येताना दिवे घाटातून जावे
का असा विचार करता लगेच सोनोरीचा किल्ला/ मल्हारगड आठवला. वेळही हातात
होता. आणी किल्लाही छोटेखानी होता.
सासवडची फ़ेमस अंजिरे येताना लक्ष वेधून घेत होती. थोडी घासाघीस करून १ किलो अंजिरे घेतली. पुढे ट्रेक करायचा आहे हा विचारच नव्हता. घरी येउपर्यंत त्यांचे पानिपत झालेच होते. असो. दिवे घाटाच्या अलीकडे एका टपरीवर सोनोरी विचारले आणि फाट्यावरून उजवीकडे गाडी वळवली.
आता एका छोट्या आणी उजाड अश्या रोडवर मी एकटाच चाललो होतो. मागे, पुढे, समोर कुठेही चीटपाखरूही दिसेना. तसचं संभ्रमित पुढे गेलो मग एक मामांना लिफ्ट दिली त्यांनी रस्ता समजावत भर गावात आणून सोडले. तेथून निघालो मल्हारगडचा बेस. सोनोरी गाव.
सासवडची फ़ेमस अंजिरे येताना लक्ष वेधून घेत होती. थोडी घासाघीस करून १ किलो अंजिरे घेतली. पुढे ट्रेक करायचा आहे हा विचारच नव्हता. घरी येउपर्यंत त्यांचे पानिपत झालेच होते. असो. दिवे घाटाच्या अलीकडे एका टपरीवर सोनोरी विचारले आणि फाट्यावरून उजवीकडे गाडी वळवली.
आता एका छोट्या आणी उजाड अश्या रोडवर मी एकटाच चाललो होतो. मागे, पुढे, समोर कुठेही चीटपाखरूही दिसेना. तसचं संभ्रमित पुढे गेलो मग एक मामांना लिफ्ट दिली त्यांनी रस्ता समजावत भर गावात आणून सोडले. तेथून निघालो मल्हारगडचा बेस. सोनोरी गाव.
गावात हनुमान मंदिरा मध्ये कसलातरी
उत्सव भरला होता. बरीच मंडळी जमलेली होती. तेथून लांबूनच दर्शन घेऊन निघालो
किल्ल्याच्या अगदी पायथ्यापर्यंत. गावात मुरलीधर मंदिर म्हणून कृष्णाचे
खूप सुरेख मंदिर आहे असे ऐकले होते. शोधत शोधत तेथे गेलो. मंदिर फार काही
चांगल्या अवस्थेत नव्हते. आजूबाजूला घरांचा आणी कचऱ्याचा वेढा पडला होता.
तेथे जाऊन बंद मंदिर बघून आजूबाजूला विचारू म्हंटले तर आजूबाजूला कोणीच
नाही. फक्त कोंबड्या. मग एका कोंबडी ला घाबरवल्यावर ती ओरडत एका घरात गेली
आणी मग तेथून एक आजोबा प्रकट झाले.
"ह्ये मंदिर बंदच असते. कधीतरी सुट्टीच्या दिवशी मालक येतात न उघडतात. पुण्याला असतात म्हणे."- इति आजोबा.
असो नो प्रोब्लेम. तेथून सुटलो आणी पोहोचलो पानसे वाडा.
मल्हारगड किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली. पानसे हे
पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते.त्यांचाच हा वाडा. आजही इतिहासाची
साक्ष देणारा हा वाडा आपल्या भक्कम ६ बुरुज आणी अजूनही सुस्थितीत अशी
तटबंदी अश्या बाहूबंदीने उभा आहे.
पानसे वाडा मुख्य दरवाजा.
मल्हारगड : सुमारे इ. स. १७५७ ते १७६० या काळातबांधला गेलेले शेवटचा किल्ला. किल्ल्यावर लावलेल्या पाटीवरही तशी नोंद आढळते.स्वराज्यातील हा शेवटचा किल्ला असल्याचे तेथे असलेल्या अवशेषांवरून लक्षात येते. किल्ल्याची तटबंदी ६-७ फुट असावी पण बाकी किल्ल्यांची रचना लक्षात घेता ह्याची रचना फारच सरळसोट वाटली.
असो. पानसे वाड्यावरून ५ मिनिटात गाडीवर पायथ्याशी आलो. लांबच लांब मोकळ्या ढाकळ्या जागेत मल्हारगड वसलेला आहे. जास्त लोकांना माहिती नसल्याने याचा पिकनिक स्पॉट झालेला नाही म्हणून का काय इथली जागा अजूनही स्वछ आहे. थोडी थोडकी कौलारू घरे, काही झोपड्या, आणी काही शेती. बाकी डोंगरच डोंगर.
मल्हारगडाचे पायथ्यावरून दर्शन.
पूर्ण निर्मनुष्य प्रदेश, "किल्ला चढून ये वरती, वरती भेटू!" म्हणत
सुर्यनारायण अस्ताकडे निघालेले , उन्हे कललेली, भूस-भुशीत मातीत टायरची
नक्षी काढत आणी धुराळा उडवत अस्मादिक एका घरापर्यंत पोहोचले. तेथे घरात
असलेल्या मंडळींच्या साक्षीने गाडी त्यांच्या घरासमोर लावून किल्ल्याची वाट
विचारून निघालो. सुमारे ५ वाजत आले होते आणी मला सूर्यास्ताच्या आत वरती
जायचे होते. पावले झपझप पडायला लागली. इलेट्रिक टॉवर च्या दिशेने चालु
लागलो.
किल्ला थोडा दृष्टीपथात येताच मुख्य वाट सोडून सरळ धारेवर चढाई चालू केली. अर्ध्या तासात प्रवेशद्वाराशी पोहोचलो. न थांबता चढाई करून आल्याने थोडा दम लागलेला म्हणून तसाच एका खंदकात बसलो. उठताना लक्षात आले की, पाठीवर रेलून बसलोय आपण आणी ब्याग मधल्या अंजीरांची भेळ झालीये.
किल्ला थोडा दृष्टीपथात येताच मुख्य वाट सोडून सरळ धारेवर चढाई चालू केली. अर्ध्या तासात प्रवेशद्वाराशी पोहोचलो. न थांबता चढाई करून आल्याने थोडा दम लागलेला म्हणून तसाच एका खंदकात बसलो. उठताना लक्षात आले की, पाठीवर रेलून बसलोय आपण आणी ब्याग मधल्या अंजीरांची भेळ झालीये.
मुख्य प्रवेशद्वारातून आत येताच समोर छोटेखानी किल्ला दिसू लागला. आजही शाबूत असलेले भलेमोठे बुरुज दिसू लागले.
मुख्य तटबंदीला समांतर असे बालेकिल्ल्याची तटबंदी आणी चोर दरवाजा दिसू लागला.
चोरदरवाजा :
एक वाट दिवे घाट सुरु होण्यापूर्वी लागणाऱ्या झेंडेवाडी गावातून येते. तेथून एक छोटासा डोंगर चढून आपण या चोर दरवाज्याशी येतो.
संपूर्ण दिवे घाट आणी परीसर यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केलेली होती. या बुरुजावरून दिवे घाट आणी परीसर दृष्टीस पडतो.
बालेकिल्ला दरवाजा :
बालेकिल्ल्यात दोन छान मंदिरे आहेत. एक महादेवाचे आणी एक खंडोबाचे. देवाचे बाहेरूनच दर्शन घेऊन थोडा वेळ मस्त फ्रेश हवा खात बसलो.
पश्चिमेच्या कागदाला जसा जसा केशरी रंग चढू लागला तसा उतरायला चालू केले. मुख्य वाट सोडून एका घासार्यावरून घसरत डायरेक्ट पायथ्याला पोहोचलो. थोडे फोटो बिटो झाल्यावर गाडीपाशी आलो. घरातून थोडे पाणी घेऊन फ्रेश झालो. माझ्याकडच्या काही गोळ्या तिथल्या लहान मुलांना दिल्या.
एव्हाना पाखरेही आपल्या घरट्याकडे निघाली होती.
चला इट्स टाइम टू गो होम नाऊ. दिवसभरात भरपूर भटकंती झाली होती. रविवार
सार्थकी लागला म्हणता येईल. येताना जेजुरी पण गेलो होतो पण तिथे असंख्य
गचाळ पब्लिक बसच्या बस भरून वाहात होते. सो अर्ध्यातूनच परत फिरलो. पण
त्यामुळे मल्हारगड मनसोक्त बघता आला. येथून निघून दिवे घाट->हडपसर->
कोथरूड.
आज दिवसभरात बरेच काही उमगले होते. प्रवास असा झाला.
कोथरूड > बोपदेव घाट > सासवड > संगमेश्वर > चांगावटेश्वर >
मोरगाव > लोणी भापकर > जेजुरी > मल्हारगड >कोथरूड.
वाचत राहा. भटकत राहा.
सागर
पांडवकालीन पांडेश्वर
पांडवकालीन पांडेश्वर.
भुलवून टाकणारे सौंदर्य: दौलत-मंगळ भुलेश्वर
भुलवून टाकणारे सौंदर्य: दौलत-मंगळ भुलेश्वर
बरेच दिवस समाधी अवस्थेत असलेल्या ब्लॉगला आज काही प्रमाणात संजीवनी मिळेल
असे वाटत आहे. मनात साचलेले खूप आहे पण खरडायला काही वेळ मिळत नाही. नवीन
नोकरी आणि कांदे-पोहे कार्यक्रम या दोन्ही गोष्टी अश्या काही मानगुटीवर
बसल्यात की गुडघे पार दुखून जातात. ( यातले कोणाला किती कळले माहित
नाही,मला काहीच कळले नाही असो. )
इतके कांदे-पोहे खाऊन दर रविवारी इतका पकलो आहे कि बास आता म्हणून मी घरातून जवळपास पळूनच गेलो काल. आणि गेलो ते डायरेक्ट सौंदर्य नगरीत.मूक सौंदर्य, शिल्प सौंदर्य, शब्दशहा भुलवून टाकणारे सौंदर्य! कमाल !
बरेच दिवस येथे जायचा मानस होता पण भूषण पुण्याला येणार मग आम्ही जाणार असा योग काही जुळत नव्हता. आज तो सकाळीच ९ वाजता शिवाजीनगर ला उपस्थित झाला आणि मग गाडीवर दोघेच चालू झालो.
पुण्याहून खाली सासवड, इंदापूर भागात बरेच काही बघण्यासारखे आहे. इंदापूर हे गाव कायम मला अवर्षण ग्रस्त गाव वाटायचे का काय माहित.
खाली नकाशात गोल केलेले बघितले तर एका दिवसात फिरायला बरेच काही आहे. एक दिवस मंदिर स्पेशल ठेऊन थेउर, भुलेश्वर, जेजुरी, मोरगाव, लोणी भापकर, पांडेश्वर, बसवेश्वर अशी बरीच प्राचीन वा जुनी मंदिरे पाहता येतात. एक ट्रीप मारून एक मंदिर बघितले तरी ते वर्थ आहे. पांडवकालीन, हेमांडपंथी पद्धतीने बांधलेली ही देवालये आणी त्यातली शिल्पकला,स्थापत्यकला केवळ अद्भुत आहे.
इतके कांदे-पोहे खाऊन दर रविवारी इतका पकलो आहे कि बास आता म्हणून मी घरातून जवळपास पळूनच गेलो काल. आणि गेलो ते डायरेक्ट सौंदर्य नगरीत.मूक सौंदर्य, शिल्प सौंदर्य, शब्दशहा भुलवून टाकणारे सौंदर्य! कमाल !
बरेच दिवस येथे जायचा मानस होता पण भूषण पुण्याला येणार मग आम्ही जाणार असा योग काही जुळत नव्हता. आज तो सकाळीच ९ वाजता शिवाजीनगर ला उपस्थित झाला आणि मग गाडीवर दोघेच चालू झालो.
पुण्याहून खाली सासवड, इंदापूर भागात बरेच काही बघण्यासारखे आहे. इंदापूर हे गाव कायम मला अवर्षण ग्रस्त गाव वाटायचे का काय माहित.
खाली नकाशात गोल केलेले बघितले तर एका दिवसात फिरायला बरेच काही आहे. एक दिवस मंदिर स्पेशल ठेऊन थेउर, भुलेश्वर, जेजुरी, मोरगाव, लोणी भापकर, पांडेश्वर, बसवेश्वर अशी बरीच प्राचीन वा जुनी मंदिरे पाहता येतात. एक ट्रीप मारून एक मंदिर बघितले तरी ते वर्थ आहे. पांडवकालीन, हेमांडपंथी पद्धतीने बांधलेली ही देवालये आणी त्यातली शिल्पकला,स्थापत्यकला केवळ अद्भुत आहे.
तर आमचा प्लान होता पुणे-> यवत-> भुलेश्वर->माळशिरस->
पांडेश्वर-> सासवड->पुणे. आणी ते पण बाईक वर. "माझ्या बाईकची दोन्ही
चाके फिरतात आणी ब्रेक लावला की थांबतात." असा एका वाक्यात तिच्यावर निबंध
होऊ शकेल. असो.
यवत पासून उजवीकडे एक फाटा फुटतो. रस्त्यावरच भुलेश्वर मंदीर अशी पाटी
लावलेली दिसते. पुण्यापासून यवत ५५ किमी आणि तेथून बोपदेव घाटातून भुलेश्वर
१५ किमी.बोपदेव घाट संपला की लगेच एक फाटा फुटतो तेथून उजवीकडे भुलेश्वर
मंदीर.
बोपदेव घाटाचा परीसर फोटो काढायला फार मस्त आहे सध्या. ( आम्हीही काही दाखवायचे फोटो काढून घेतले हेही जाता जाता)
मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा ढग भरून आलेच होते. मस्त हिरवागार,निर्जन परिसर,
हलकासा पाऊस. मजा आली. हलकाश्या पाऊसात निवांत गाडी चालवत गप्पा टप्पा करत
चाललो होतो. एखाद दुसरी दुधाची गाडी ये जा करत होती.बोपदेव घाटाचा परीसर फोटो काढायला फार मस्त आहे सध्या. ( आम्हीही काही दाखवायचे फोटो काढून घेतले हेही जाता जाता)
एवढा पाऊस पडून, संपूर्ण प्रदेश हिरवागार होऊनही याच्या नशिबात नव पालवी नसावी. वार्धक्याच्या खुणा सोसतच काही आयुष्ये सुखाला समांतर जातात.
येथून सरळ गेले की माळशिरस गाव आणी डावीकडे बोपदेव घाट.
पाऊस थांबला तसे आम्ही मंदिरात पोहोचलो. गणपतीचे दिवस असल्याने गर्दी जास्त नव्हती. मंदिराच्या कळसाची डागडुजी चालू असून शिल्पांना चुनकळीच्या रंगाने लेप देण्याच्या प्रकार सुरु आहे असे समजले. जो माणूस हे सांगत होता त्याच्या मित्राने सगळे ऐकून एकाच प्रश्न विचारला. "जमणार आहे का पण आपल्या लोकांना हे?"
तेही खरच आहे म्हणा,कारण इतके बारीक आणी तपशिलात हे कोरीवकाम केलेले आहे की त्याचे कोटिंग करणे पण सोपे काम नाहीये. असो.
इतकी वर्षे स्वतःचे अस्तित्व जपून उभे असलेले हे मंदिर म्हणजे दौलत मंगळ किल्ल्याचा भाग आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेल्या अवस्थेत असून पायरी वाटेने आल्यास त्याचे अवशेष दिसतात.
बाकी एक भलामोठा बुरुज आणी एक मोठे प्रवेशद्वार आजही भक्कम स्थितीत आहे.
आता येथून सुरु झाली ऐतिहासिक शिल्पांची अद्भुत सफर आणी स्थापत्यकलेच्या सौंदर्याची मुक्त उधळण.
कॅमेरे सरसावून, बूट काढून दोन पाऊले चाललो तेवढ्यात पहिल्याच प्रवेशद्वारापासून अत्यंत सुबक आणि प्रेक्षणीय शिल्पांचे दर्शन घडले. निव्वळ शब्दातीत.
हत्तीवर आक्रमण करताना वाघ्र शिल्प.
प्रवेशद्वारावरील द्वारपालाचे शिल्प.
या शिल्पाच्या चेहेर्यावरील भाव किती मंद, शांत आणि हळुवार आहेत नाही? कसा तृप्त वाटतो चेहेरा. कानात कर्णफुले आणी मुगुट.
ऐरावातावळ
मंदिरात प्रवेश केला आणी एकदम यादवकाळात गेलो. ऐतिहासिक श्रीमंती म्हणजे काय ते क्षणा क्षणाला कळत होते. मंदिरात पूर्णतः काळोख आणी काही ठिकाणी केलेली नैसर्गिक प्रकाशव्यवस्था.
महानंदी
मुख्य मंदिरात प्रवेश करताच प्रथम दर्शन झाले ते महानंदीचे. मंदिराच्या
मुख्य मांडवात हा भलामोठा नंदी शिवमंदिराच्या गाभारयामुख आहे. प्रत्येक अन
प्रत्येक खांब पौराणिक दृश्यांच्या शिल्पाने कोरलेले आहेत. मंदिराचा एकाही
भाग असा नाही ज्यावर काही कोरलेले नाही. एवढे बारीक डिटेल काम पाहून डोके
चक्रावून जाते.
महाभारतातील अर्जुन-कर्ण युद्धाचा प्रसंग.
युद्ध दर्शवताना हवेत मारलेले बाणही स्पष्ट दिसतात.
No comments:
Post a Comment